राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं? मनसेच्या सभेत एक खुर्ची रिकामी; उद्धव ठाकरे गटाच्या या नेत्याला का दिले निमंत्रण

MNS Vikroli Sabha : राज्याच्या राजकारणात इतक्या वेगानं घडामोडी घडत आहेत की, राजकीय पंडित सुद्धा त्याचा अंदाज मांडू शकत नाही. गेल्या दोन वर्षात तर राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं घडली आहेत. दोन पक्ष फुटली आहेत. तर अनेक जण या पक्षातून त्या पक्षात गेले आहे. आता मनसेच्या सभेला उद्धव ठाकरे गटाच्या या बड्या नेत्याला निमंत्रण देण्यात आले आहे.

राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं? मनसेच्या सभेत एक खुर्ची रिकामी; उद्धव ठाकरे गटाच्या या नेत्याला का दिले निमंत्रण
सभेत एक खुर्ची रिकामी
| Updated on: Nov 12, 2024 | 4:30 PM

सध्या राजकीय धुराळा उडाला आहे. विधानसभा निवडणुकीत रणधुमाळी माजली आहे. प्रचारांच्या तोफा धडाडल्या आहेत. एकमेकांवर वैखरी टीका सुरू आहे. राज्यात वेगाने घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या राजकीय गोळाबेरजेत गुणाकार करण्याचा निर्धार अगोदरच व्यक्त केला आहे. महायुती सरकारला मनसेचा टेकू असणार असल्याची चर्चा रंगली आहे. अथवा महायुतीत मनसे मोठ्या भूमिकेत दिसू शकतो अशी पण एक चर्चा होत आहे. त्यातच आता मनसेच्या सभेला उद्धव ठाकरे गटाच्या या बड्या नेत्याला निमंत्रण दिल्याने खळबळ उडाली आहे.

कुणाला दिलं निमंत्रण?

राज ठाकरे यांची विक्रोळीमध्ये सभा होत आहे. या सभेला मनसेकडून संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिली आहे. या नवीन प्रकारामुळे मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर सडकून टीका सुरू असताना मनसेच्या मंचावर संजय राऊत कसे येतील आणि का येतील असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेने संजय राऊत यांना का निमंत्रण दिले यावर खल सुरू आहे. अर्थात याला या वादाचीच किनार आहे.

संजय राऊत यांना मनसेचा भीमटोला

संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय ते काहीही बोलतात. त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी त्यांना विक्रोळी येथे होणाऱ्या मनसेच्या सभेला निमंत्रण धाडण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राजकीय विचार कसे असावेत व विचारांची देवाण घेवाण कशी असावी या यासाठी त्यांना सभेला बोलावण्यात आल्याचा चिमटा मनोज चव्हाण यांनी काढला.

राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रात किंमत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले होते. त्यानंतर हा वाद आता पेटला आहे. राज ठाकरे यांनी भाजपाला अनुकूल भूमिका घेतल्यापासून महाविकास आघाडीतून त्यांच्यावर तोफगोळे डागण्यात येत आहेत. आता मनसेने त्यांना सभेचे निमंत्रण देऊन मोठी खेळी खेळली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us