मराठी कलाकारांचं वास्तव्य असलेलं बिंबीसारनगर सील, एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना, नोकरही बाधित

| Updated on: Mar 31, 2020 | 8:54 AM

मुंबईतील बिंबीसारनगरमध्ये सुबोध भावे, जयवंत वाडकर, आतिशा नाईक, स्वप्नील जयकर यासारखे अनेक मराठी कलाकार राहतात. (Bimbisarnagar sealed Corona Patient Found)

मराठी कलाकारांचं वास्तव्य असलेलं बिंबीसारनगर सील, एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना, नोकरही बाधित
Follow us on

मुंबई : ‘कोरोनाग्रस्त’ व्यक्ती आढळल्यामुळे मुंबईच्या गोरेगाव भागातील बिंबीसारनगर सील करण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आली आहे. या भागात अनेक मराठी कलाकारांचं वास्तव्य आहे. (Bimbisarnagar sealed Corona Patient Found)

मुंबईतील बिंबीसारनगरमध्ये सुबोध भावे, आतिशा नाईक, स्वप्नील जयकर यासारखे अनेक मराठी कलाकार राहतात. तर दिग्गज अभिनेते जयवंत वाडकर यांच्या बिल्डिंगमध्ये संबंधित ‘कोरोनाग्रस्त’ कुटुंब राहतं. ‘कोरोनाग्रस्त’ व्यक्ती आढळल्यामुळे कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.

दरम्यान, इथली परिस्थिती खूप भीषण असल्याचं जयवंत वाडकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या सूचना पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या महिलेला कोरोना वायरसची लागण झाली आहे. त्यामुळेच तिच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ आणि नोकरालाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील चारही जणांना हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Bimbisarnagar sealed Corona Patient Found)

महापालिकेच्या आरोग्य विभागाने समूह संसर्ग होऊ नये, यासाठी बिंबीसार नगरात प्रवेशबंदी केली. तर महापालिका आणि पोलिसांनी निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे

मुंबईत गेल्या 24 तासांत 28 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत, तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात कालच्या दिवसात सापडलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 47 वर गेली आहे.

वरळी कोळीवाडा सील

मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे पाचहून अधिक कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वरळी कोळीवाडा सील करण्यात आला आहे. मागील 2 दिवसात त्यांना उपचारासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह पोलिस प्रशासन हायअलर्टवर असल्याचं पाहायला मिळत आहेत.

कोळीवाड्यात जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कुणाला बाहेरही येऊ दिले जात नाही. या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी देखील युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे.

कोळीवाडा हा प्रचंड दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे. येथे बैठ्या चाळीत नागरिक राहतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास मुंबईवरील कोरोनाचा धोका अनेक पटीने वाढणार आहे. हाच धोका लक्षात घेऊन कोरोना संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका प्रशासनासह इतर यंत्रणा अलर्ट झाल्या.