AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईत जोरदार तयारी; 300 बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. | Coronavirus third wave Mumbai

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईत जोरदार तयारी; 300 बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण
कोरोना व्हायरस
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती उद्भवलेल्या मुंबईत आता प्रशासनाने आगामी संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जोरदार तयारी सुरु केली आहे. कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पालिका आणि खासगी रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण देणे सुरु केले आहे. आतापर्यंत मुंबईतील 300 बालरोगतज्ज्ञांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. (Preparation for Covid 19 third wave in Mumbai)

तर दुसरीकडे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी 10 ते 15 बेडसचे वॉर्ड आहेत. तर मुलुंड जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 100, नेस्कोमध्ये 100 ते 200 तर दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 100 बेडस् राखीव ठेवण्यात आले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या घटली

रविवारी महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांतील सर्वात कमी म्हणजे 12557 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून मुंबईतील परिस्थितीही जवळपास नियंत्रणात आली आहे. मुंबईत सध्या कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 5.56 टक्के इतका असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के इतके आहे. तर कोरोनाचा डबलिंग रेट 511 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीशी उसंत मिळाली असून या वेळेत पालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी मृतांचा आकडा चिंताजनक आहे. राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये आतापर्यंत एक लाख 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक 14971 मृत्यू मुंबईतील तर 13348 मृत्यू पुण्यातील आहेत.

संबंधित बातम्या:

‘चार दिवसांत केंद्राकडून पुण्यासाठी सिरमची लस आणा, अन्यथा भाजपविरोधात घंटानाद आंदोलन करु’

कोरोनाचे आव्हान कायम, राज्यातील निर्बंध शिथील नाहीत, जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे

कोरोनाची तिसरी लाट आली तर उद्योग थांबता कामा नये: उद्धव ठाकरे

(Preparation for Covid 19 third wave in Mumbai)

Follow Us
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.