वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बीएमसी अलर्टवर, वांद्र्यात 650 जणांना दंड, 145 कॅफे अँड बारवर गुन्हे

| Updated on: Feb 21, 2021 | 7:06 AM

दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्सवर धडक कारवाई केली जात आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बीएमसी अलर्टवर, वांद्र्यात 650 जणांना दंड, 145 कॅफे अँड बारवर गुन्हे
corona Update
Follow us on

मुंबई : मुंबईसोबतच महराष्ट्राच्या इतर अनेक भागात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिका (BMC Raids On Hotels And Bars) अलर्ट झाली आहे. म्हणून दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्सवर धडक कारवाई केली जात आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास वांद्रे आणि खार परिसरातल्या पाच रेस्टॉरंन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे (BMC Raids On Hotels And Bars).

650 जणांवर दंडात्मक कारवाई

यात जवळपास 650 जणांकडून महापालिकेने 1 लाखापेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. वांद्रे येथील 145 कॅफे अँड बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पालळा गेला नाही. म्हणून सदर व्यवस्थापनावर संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात एच वॉर्डच्या आरोग्य खात्यामार्फत या कॅफे अँड बारवर 188, 269 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

त्याचसोबत वांद्र्यातील आयरिश हाऊस, खार स्टेशनजवळील क्वॉर्टर पिलर, थ्री वाईस मंकी आणि यू-टर्न लाऊन्जमध्ये देखील महापालिकेकडून तपासणी करण्यात आली. ज्यात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली झालेली दिसली आणि विना मास्क असलेले ग्राहक आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर मनपाकडून दंडात्मक कारवाई केली गेली आहे (BMC Raids On Hotels And Bars).

मुंबईच्या अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पालिकेकडूनही वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु आहे. सर्वसामान्य लोकांनी सावध राहावे नियमांचे पालन करावे, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

BMC Raids On Hotels And Bars

संबंधित बातम्या :

मोठी बातमी : राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत

दिल्लीतून महाराष्ट्रात कोरोना पाठवला जातो का? नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलणार? मुख्यमंत्री मोदींना म्हणतात, कायदा करा!

Corona Updates : महाराष्ट्रात कोरोना आलेख चढाच! दिवसभरात राज्यात 6 हजार 281 रुग्णांची भर, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?