AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतून महाराष्ट्रात कोरोना पाठवला जातो का? नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर कोरोना साथीरोगाच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.

दिल्लीतून महाराष्ट्रात कोरोना पाठवला जातो का? नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 20, 2021 | 6:16 PM
Share

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर कोरोना साथीरोगाच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. भाजप नेते भांबावले असून ते कोरोनावर राजकारण करत आहेत. उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिसत नाही, मग दिल्लीतून कोरोना महाराष्ट्रात पाठवला जातोय का? असा सवालही नाना पटोले यांनी विचारला (Nana Patole criticize BJP over politics on Corona in Maharashtra).

नाना पटोले म्हणाले, “जनतेच्या आरोग्य सुविधाबाबत सरकार सकारात्मक आहे. मग भाजप का राजकारण करते? उत्तर प्रदेश, गुजरात या मोठ्या राज्यांमध्ये संख्या दिसतच नाही. दिल्लीतून कोरोना महाराष्ट्रात पाठवला जातो का? हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. या कोरोणावर राजकारण करू नका. भाजप नेते भांबावले आहेत.”

“डिझेल-पेट्रोलच्या महागाईवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून इतर प्रश्न उपस्थित”

“डिझेल पेट्रोल महाग झालाय. त्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी भाजप इतर प्रश्न उपस्थित करत आहे. जे टीका करतात त्यांना गुजराती समाज आपल्या खिशात आहे असं वाटतंय. आमच्या गुजराती सेलचा मेळावा होता. देशात गुजराती समाजाचं काम कसं सुरू आहे. त्याबाबत मेळावा होता, पण हाच समाज त्यांना धडा शिकवीन,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“स्थानिक आघाडीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना विचारावं लागेल”

“महाविकास आघाडीचा उद्देश भाजपला दूर ठेवणे हा होता. भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. स्थानिक आघाडीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना विचारावं लागेल,” असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आघाडीवरील चेंडू पटोले यांनी कार्यकर्त्यांकडे टोलावला आहे.

“देशापेक्षा कोणी मोठं नसतं”

नाना पटोले म्हणाले, “देशाची सुरक्षा धोक्यात आलीय. देशापेक्षा कोणी मोठं नसतं. भाजप देशाचं वस्त्रहरण करत आहे. देश विकायला निघाले आहेत. भाजपवाले काहीही बोलत आहेत. चंद्रकांत पाटील काहीही बोलतात. त्यांना काहीही बोलायचा अधिकार आहे.”

“भाजप घुसखोरांना पक्षाचा पदाधिकारी कसं करतं?”

“उत्तर मुंबईचा भाजप अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष बांगलादेशी घुसखोर आहे. त्याचं नाव रुबल शेख असून त्याच्याविरोधात पनवेलमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. गायीचं मास निर्यात करण्याची टोळी पकडली, त्यातही भाजपचे पदाधिकारी सापडले. अमित शाह यांना थेट प्रश्न आहे, की भाजपकडे आलेला वाल्या वाल्मिकी होतो आणि दुसऱ्याकडे तो देशद्रोह हा काय प्रकार आहे? तुम्ही घुसखोरांना पक्षाचे पदाधिकारी का करतात याचा विचार करा,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : 

‘झुंड’वरुन झुंज, बिग बींकडून सिनेमाची तारीख जाहीर, नाना पटोलेंकडून आंदोलनाची घोषणा

‘सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन’, नानाच्या नाना तऱ्हा; भाजपची पटोलेंवर टीका

‘…तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?’ नाना पटोलेंचा फडणवीसांना उद्देशून सवाल

व्हिडीओ पाहा :

Nana Patole criticize BJP over politics on Corona in Maharashtra

Follow Us
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...