AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल पाऊण तास उशिराने

मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा उशिराने सुरू आहेत. नालासोपारा आणि कल्याण-डोंबिवलीसारख्या परिसरांमध्येही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल पाऊण तास उशिराने
mumbai local train
| Updated on: Jun 19, 2025 | 5:01 PM
Share

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. आज दिवसभर मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कल, परळ यासारख्या सखल भागात पावसाचा मोठा फटका बसला.  मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला बसला आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे सध्या मध्य रेल्वेवरील सर्व लोकल पाऊण तास उशिराने धावत आहेत. अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे सीएसएमटी जाणाऱ्या आणि तेथून सुटणाऱ्या लोकल सेवांवर परिणाम झाला आहे. तर, पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिराने सुरू आहे. पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने आणि दृष्यमानता कमी झाल्याने लोकल सेवा धीम्या गतीने धावत आहेत. याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसला आहे. घरी परतणारे अनेक प्रवासी स्थानकांवर अडकून पडले आहेत.

मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी माहितीसाठी संबंधित ॲप्स किंवा सोशल मीडिया खाती तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नालासोपाऱ्यात पावसामुळे रस्ते पाण्याखाली 

नालासोपारा पूर्व येथील आचोळा मुख्य रस्ता रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. विरार आणि वसईला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यावर तब्बल दोन फूट पाणी साचले आहे. यामुळे रुग्णवाहिका, इतर वाहने आणि पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. रात्रीपासून पावसाची उघडझाप सुरू असली तरी, पहाटेपासून परिसरात रिमझिम पाऊस आणि अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत, ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीला पावसाचा फटका

याचबरोबर, कल्याण पश्चिम भागालाही पावसाचा फटका बसला आहे. मोहम्मद अली चौक रोडवर पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना वाढत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत