Central Railway Update | मध्य रेल्वे विस्कळीत, किती मिनिट उशिराने धावतायत ट्रेन?

Central Railway Update | मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ट्रेन्स उशिराने धावत आहेत. लोकल प्रवासाला होणाऱ्या या विलंबामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे वाहतूक कोलमडली आहे.

Central Railway Update | मध्य रेल्वे विस्कळीत, किती मिनिट उशिराने धावतायत ट्रेन?
Mumbai Local
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Sep 20, 2023 | 12:01 PM

मुंबई : मुंबई लोकलला लाईफलाइन म्हटलं जातं. मोठ्या संख्येने मुंबईकर लोकल सेवेवर अवलंबून असतात. अशावेळी मुंबईची लोकल सेवा कोलमडली तर नोकरदारांचे चांगलेच हाल होतात. अगदी काही मिनिटांच्या विलंबामुळे सगळ्या दिवसाच वेळापत्रक कोलमडत. मुंबईकरांच दिवसाच वेळापत्रक लोकलच्या वेळेनुसार ठरतं. ठरलेल्या वेळेला लोकल पकडायची. ती ठरलेल्या वेळेत पोहोचणार. कामावरुन निघाल्यानंतरही तसच नियोजन असतं. यात मध्ये सिग्नल यंत्रणा किंवा अन्य कारणांमुळे बिघाड झाला, तर मुंबईकरांचे हाल होतात. मध्य, पश्चिम आणि हार्बर लोकलवर प्रवासी मोठ्या संख्येने अवलंबून आहेत. दररोज 70 ते 75 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. नोकरीसाठी अगदी कर्जत-कसाऱ्यावरुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे. निदान उत्सव काळात तरी लोकल सेवा सुरळीत सुरु रहावी, अशी अपेक्षा असते. पण आज बुधवारी मध्य रेल्वे विस्कळीत झालीय, बदलापूरवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तांत्रिक बिघाड असल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. स्टेशनवर ट्रेन उशिराने धावत असल्याची घोषणा करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. बदलापूरवरून अंबरनाथच्या दिशेने 10:40 ला येणारी ट्रेन 11.05 ला आल्याने रेल्वे प्रवाशी संतप्त आहेत.

….म्हणून लोकल सेवा मुंबईची लाईफलाइन

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लोकल सेवा ही मुंबईचा कणा आहे. मुंबईत बऱ्याच गोष्टी लोकलवर अवलंबून असतात. लोकलच्या वेळेत बदल झाला किंवा बिघाड झाला, तर मुंबईकर अक्षरक्ष: हैराण होतात. एखाद्या लोकलला काही मिनिट जरी उशिरा झाला, तरी लगेच रेल्वे स्थानकात गर्दी होते. मग उशिराने धावणाऱ्या लोकलमध्ये मुंगीलाही शिरायला वाव नसतो. अशा परिस्थितीत मुंबईकरांना काहीवेळा प्रवास करावा लागतो. त्यामुळे लोकल सेवेला मुंबईची लाईफलाइन म्हटलय.