AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेस्टच्या ताफ्यात नवीन 1300 बसेस, कामगार संघटनेने दिली महत्वाचा सल्ला

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कुर्ला बस अपघाताचा विषय विधान परिषदेत सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1300 बसेस घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.

बेस्टच्या ताफ्यात नवीन 1300 बसेस, कामगार संघटनेने दिली महत्वाचा सल्ला
| Updated on: Dec 16, 2024 | 4:10 PM
Share

Best Bus: मुंबईत काही दिवसांपूर्वी बेस्ट बसचा अपघात झाला होता. या अपघात सात जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातावर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अपघाता़ची घटना गंभीर आहे. राज्य शासनाने त्याची दखल घेतली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. बसच्या अपघातातील वाहनचालकाची तपासणी केली आहे. तसेच. बेस्टमध्ये नवीन बसेस घेण्यासाठी 1300 बसेसची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्या बसेस लवकरच ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कुर्ला बस अपघाताचा विषय विधान परिषदेत सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1300 बसेस घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यावर बोलताना बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत म्हणाले, बेस्टच्या बसेस बंद पडणे तसेच इतर कारणांसाठी मागील ८ महिन्यांत आयुक्तांना भेटण्यासाठी १२ पत्रे दिली. त्यात कुर्ला अपघातामुळे डोक्याहून पाणी गेले. ड्रायव्हर दारू घेण्यासाठी बसेस थांबतात, असा व्हिडिओ आला. आता १३०० गाड्या नवीन येणार आहे. परंतु या गाड्या चालवण्यासाठी भाड्याने देऊ नका, असे सुहास सामंत यांनी म्हटले.

बसेस भाड्याने देऊ नका…

सरकार नवीन बसेससाठी मोठा पैसा खर्च करते. परंतु त्या भाड्याने देतात. त्यामुळे त्यांची मालकी होते. तसेच बसेस चालवण्यासाठी रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर बोलावतात, असा आरोप सुहास सामंत यांनी केला. बसेसमध्ये कोंबून लोक भरलेले असतात. त्यामुळे अपघात होतात. बेस्टची सार्वजनिक जबाबदारी ही देखील महापालिकेची आहे.

अनेक छोट्या बसेस धूळखात पडल्या आहेत? त्या बसेस फेल गेलेल्या आहेत. नको त्या कंपन्यांच्या गाड्या आणल्या गेल्या. त्या फेल गेल्या आहेत. त्याच्यावर बेस्टच्या लोगो असल्याने बेस्टची नाचक्की होत आहे, असे बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी म्हटले आहे.

Follow Us
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.