जरांगे यांच्या मागे कोण…सर्व गोष्टी बाहेर येऊ लागल्या, देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे

Devendra Fadnavis | रात्री जाऊन मनोज जरांगे यांना परत आणणारे कोण आहेत. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपी जबाबात सांगितले की, आम्हाला दगडफेक करा, असे सांगितले. ज्या पोलिसांववर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का?

जरांगे यांच्या मागे कोण...सर्व गोष्टी बाहेर येऊ लागल्या, देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे
devendra fadnavis
| Updated on: Feb 27, 2024 | 11:21 AM

मुंबई, दि. 27 फेब्रुवारी 2024 | विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार प्रतिसाद उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागे कोण आहे? त्याची सर्व सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एक, एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व समोर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे? याबाबत चर्चा होऊ लागली आहे.

काय म्हणाले फडणवीस

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, रात्री जाऊन मनोज जरांगे यांना परत आणणारे कोण आहेत. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपींनी जबाबात सांगितले की, आम्हाला दगडफेक करा, असे सांगितले. ज्या पोलिसांववर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का? आपल्या पोलिसांना मारायचे आणि आपण शांत बसायचे का? आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्च शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.

जरांगे यांचे कोणासोबत फोटो

फडणवीस म्हणाले की, राजकारण आपल्या स्तरावर चालत राहणार आहे. पण आज समाजाला विघटन करण्याचे काम चालले. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहे. कोणाच्या पैसा त्याच्यामागे आहे. यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि तुम्ही कोणाची आयामाय काढणार असेल तर कसे चालणार.

बोलविता धनी समोर येणार

अध्यक्षांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार आता चौकशी होणार आहे. माझी जरांगे यांच्यासंदर्भात तक्रार नाही. पण जरांगे यांच्या पाठीमागे बोलवतो धनी कोण आहे, ही स्क्रीप्ट काही लोक रोज बोलतात. आता ती स्क्रीप्ट जरांगे बोलत आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबईत वॉर रुम कोणी उघडली. ही सर्व माहिती मिळू लागली आहे. सर्व चौकशी करुन हे षडयंत्र बाहेर आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.