AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनोज जरांगे सागर बंगल्यावर आले तर…’; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. याआधी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी मनोज जरांगे यांच्या सागर बंगल्यावर येण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'मनोज जरांगे सागर बंगल्यावर आले तर...'; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Feb 25, 2024 | 8:25 PM
Share

मुंबई : मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस  यांनी षडयंत्र रचले आहे. माझ्या सलाईनमधून मला मारायचा प्रयत्न झाल्याचाही आरोप जरांगेंनी केला. जरांगे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येणार आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

सागर बंगला हा सरकारी आहे. कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं.कोणाचीही अडवणुक नाही. कुठल्या निरशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवी आहे ते मला माहिती नाही. ते जे बोलले ते बिन बुडाचे आरोप असून धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे. मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळ ही सुरु केली. सर्व योजनांची सुरूवात मी केल्याचं फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षण हाय कोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं. त्यामुळे कोणी बोललं म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब बोलत होते. तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलता आहेत हा प्रश्न आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सरकारने संयम ठेवलेला आहे, आमचा अंत पाहू नका- मुख्यमंत्री

जी मागणी केली होती त्यानुसार आम्ही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेला शब्द पाळला आहे. आता आरक्षण दिल्यावर मागणी बदलणं म्हणजे तुम्ही राजकारण करू लागले आहात. मनोज जरांगे यांना कोणाचंही ऐकू नये, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नये. सरकारने संयम ठेवलेला आहे अंत पाहू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन.
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत.
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची.
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर....
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर.....
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का.
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा..
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा...
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक.