AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाच्या झळा आणि रेल्वेस्थानकांवरील पाणी बंदीने प्रवासी तहानेने व्याकूळ

रेल्वे स्थानकांवर पाणी मिळत नसल्याने उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासात स्वत: सोबत पाण्याची बाटली बाळगावी लागत आहे.

उन्हाच्या झळा आणि रेल्वेस्थानकांवरील पाणी बंदीने प्रवासी तहानेने व्याकूळ
Water-Vending-MachineImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 23, 2023 | 9:02 AM
Share

मुंबई : सध्या उन्हाचा तडाका वाढला असून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे स्थानकांवर स्वस्तात उपलब्ध असलेल्या बाटली बंद रेलनीरचा ( RAILNEER )  तुटवडा जाणवत असल्याने प्रवासी ( PASSENGER ) तहानेने व्याकूळ झाले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरील स्टॉलना सध्या अंबरनाथ येथील रेलनीरच्या प्रकल्पातून रेलनीरचा पुरवठा होणे कमी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वत: जवळ पाण्याची बाटली बाळगावी लागत आहे.

सध्या फेब्रुवारी महिन्यातच पारा वाढला असून कडक उन्हामुळे बाटलीबंद पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील स्वस्त पाण्याच्या वॉटर वेंडींग मशिन बंद पडल्या आहेत. त्यातच रेलनीरच्या अंबरनाथ येथील प्रकल्पातून बाटली बंद पाण्याचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे प्रवासी तहानेने व्याकूळ झाले आहेत. रेल्वे स्थानकांवरील आयआरसीटीसीच्या कंत्राटी स्वस्त पाणी विकणाऱ्या मशिन गेली अनेक वर्षे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्वत: जवळ पाणी बाळगणे गरजेचे बनले आहे.

अंबरनाथच्या रेलनीर प्रकल्पात मेन्टेनन्सचे काम सुरू आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरील स्टॉलवर मिळणारे स्वस्तातील रेलनीर मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. याबाबत आयआरसीटीसीने मध्य आणि पश्चिम रेल्वेला 20 फेब्रुवारीला माहिती दिली आहे. अंबरनाथच्या रेलनीर निर्मिती प्रकल्पाचे मेन्टेनन्सचे काम सुरू असल्याने येत्या 8 मार्चपर्यंत पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासात स्वत: सोबत पाण्याची बाटली बाळगावी लागत आहे.

आयआरसीटीसीच्या रेल्वे स्थानकातील वॉटर वेंडिंग मशिन आर्थिक गणित बिघडल्याने बंद पडल्या आहेत. पश्चिम रेल्वेने धर्मादाय योजनेतून वॉटर कूलर बसविले आहेत. मध्य रेल्वेवर पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वॉटर कूलर बसविण्यासाठी टेंडरचे वाटप झाले असले तरी प्रत्यक्षात वॉटर वेंडिंग मशिन लागेपर्यंत पावसाळा सुरू होईल असे म्हटले जात आहे.

उपनगरी रेल्वे स्थानकातून मागणी वाढल्यास दरवर्षी अंबरनाथच्या रेल नीर प्रकल्पातून अपुरा पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे सर्व रेल्वे स्थानकावर लवकराच लवकर वॉटर कुलर बसविण्यात यावेत अशी मागणी होत आहे. ‘रेल नीर’चा पुरवठा अपुरा होत असल्याने प्रवाशांना इतर ब्रँडचे बाटली बंद पाणी मिळावे म्हणून रेल्वेच्या स्टॉलना इतर बँडचे पाणी विकण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली होती. त्यास रेल्वेकडून प्रतिसाद मिळत आहे.

Follow Us
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश