AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खव्वय्यांसाठी गोड बातमी, मुंबईच्या बाजारात कोकणातील आंबा दाखल

First box of kesar mango in Mumbai: वगड येथील केसर शेतकऱ्याने विक्रीसाठी मुंबईत आणला आहे. २०२५ च्या हंगामातील केसर आंब्याची ही पहिली पेटी आहे. त्यामुळे त्याची पूजाही व्यापाऱ्यांनी केली. या पेटीला १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खव्वय्यांसाठी गोड बातमी, मुंबईच्या बाजारात कोकणातील आंबा दाखल
| Updated on: Jan 06, 2025 | 3:10 PM
Share

First box of kesar mango in Mumbai:दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिना आला म्हणजे खव्वय्यांना आंब्याचे वेध लागते. मुंबई, पुण्याच्या बाजारात या महिन्यात पहिली पेटी दाखल होती. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून आंबे मिळण्यास सुरुवात होतात. आता नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोकणातील आंबा सोमवारी दाखल झाला आहे. यंदा पावसामुळे आंबा उशिराने आला आहे. त्याचा परिणाम आंब्याचा हंगाम फेब्रुवारी ऐवजी मार्चमध्ये सुरु होणार आहे. आंब्याची पहिली पेटी दाखल झाल्यानंतर त्याची पूजाही करण्यात आली.

यंदा मार्च महिन्यांत आंब्याचा हंगाम

नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोकणातील पहिला आंबा दाखल झाला आहे. कोकणातील देवगड येथून केसर आंब्याची पेटी दाखल झाली आहे. यंदा पावस चांगला झाला. सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. त्यानंतर अवकाळी पाऊस झाला. यामुळे बाजारात आंबा उशिराने दाखल झाला आहे. त्याचा परिणाम यंदा आंब्याच्या हंगामास उशीर होणार आहे. दरवर्षी फ्रेबुरवारीमध्ये आंब्याचा हंगाम सुरु होतो. यंदा मार्चमध्ये हा हंगाम सुरु होणार आहे.

कोकणातून पहिली आंब्याची पेटी मुंबईत

यंदा हापूसच्या आधी केसर बाजारात

कोकणातील हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. त्याची चव इतर कोणत्याही आंब्यास नाही. यंदा हापूस आंब्या ऐवजी केशर आंब्याने हंगामाची सुरुवात झाली. आंब्यामध्ये हापूस आणि केसर आंब्यांना मोठी मागणी असते. आता देवगड येथील केसर शेतकऱ्याने विक्रीसाठी मुंबईत आणला आहे. २०२५ च्या हंगामातील केसर आंब्याची ही पहिली पेटी आहे. त्यामुळे त्याची पूजाही व्यापाऱ्यांनी केली.

किती मिळणार दर

कोकणातील देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्या शेतातील हे आंबे आहेत. या पेटीला १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही पहिली आंब्याची पेटी कोण घेतो? त्या आंब्यास किती दर देणार? याकडे आंबे प्रेमींचे लक्ष लागले आहे. मुंबईत आंबे दाखल झाल्यानंतर पुण्यातील बाजारपेठेतही लवकरच यंदाच्या हंगामातील पहिली पेटी दाखल होणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.