AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain Update : मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठा पाचपट वाढला, आता किती टक्के पाणीसाठा? वाचा

मुंबई महानगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Rain Update : मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठा पाचपट वाढला, आता किती टक्के पाणीसाठा? वाचा
Image Credit source: dnaindia.com
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jul 15, 2022 | 6:58 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्याला मुसळधार (Mumbai Rain Update) पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीही (Flood) तयार झाली आहे. मात्र अशातच मुंबईकरांसाठी एक मोठा दिलासा देणारी माहिती समोर आलीआहे. पाणलोट क्षेत्रातील संततधार आणि मुसळधार पावसामुळे अवघ्या 10 दिवसांत मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांच्या एकत्रित पाणीसाठ्यात पाच पटीने (Mumbai Dam Water Supply) वाढ झाली आहे. 5 जुलै रोजी नोंदवलेला पाणीसाठा 14.76 टक्के होता, तो आता 74.82 टक्क्यांवर पोहोचला आहे, असे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई महानगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

दोन दिवसात धरणं ओव्हरफ्लो

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर आणि तानसा ही दोन धरणे गुरुवारी ओसंडून वाहू लागली. महानगरपालिका अधिकाऱ्याने सांगितले की गेल्या पंधरवड्यात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने, सात पैकी दोन धरणे गेल्या 48 तासांत ओसंडून वाहू लागली आहेत.

कुठून किती पाणीपुरवठा?

36,61,133 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) साठवण क्षमता असलेले मोडक सागर बुधवारी दुपारपासून ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली, तर 96,894 एमएलडी साठवण क्षमता असलेले तानसा धरण गुरुवारी संध्याकाळपासून ओव्हरफ्लो झाले. या जलाशयांची एकत्रित पाणी साठवण क्षमता 14,47,363 MLD आहे. या ठिकाणांहून शहराला दररोज 3,850 एमएलडी पिण्यायोग्य पाणी पुरवठा केला जातो.

पाणीकपातही मागे घेण्यात आली

या महिन्याच्या सुरुवातीला शहरातील पवई तलाव काठोकाठ भरला, मात्र तलावातील पाणी पिण्यायोग्य नसून ते फक्त औद्योगिक कामांसाठी वापरले जाते. बीएमसीने यापूर्वी शहर आणि उपनगरात 10 टक्के पाणीकपात लागू केली होती, परंतु पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने अलीकडेच ती मागे घेतली.

पुढील काही तासही पावसाचे राहण्याची शक्यता

शुक्रवारी शहर आणि उपनगरात बहुतांश ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने काही ठिकाणी जोरदार सरी पडल्याने शुक्रवारी दिलासा दिला.हवामानशास्त्र विभागाने पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांच्या अनेक समस्यापैकी पाणी ही एक अत्यंत महत्वाची समस्या आहे. धरणात मुबलक पाणीसाठी नसेल तर मुंबईकरांना पाणीकपातीला समोरे जावं लागतं मात्र तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे.

Follow Us
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!