AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सूनची मोठी अपडेट : अखेर तो येणार… ‘या’ तारखेला राज्यात मान्सूनची धडक; पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्रात उष्णतेची लाट

मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मान्सूनची मोठी अपडेट : अखेर तो येणार... 'या' तारखेला राज्यात मान्सूनची धडक; पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्रात उष्णतेची लाट
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 22, 2023 | 9:05 AM
Share

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून उकाड्याचा सामना करावा लागणाऱ्या मुंबईकरांना आजचा दिवस दिलासा मिळणार आहे. आज दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची काहिली थांबणार आहे. तसेच आजपासून तीन दिवसात राज्यातील काही भागात पाऊस येणार आहे. मात्र, राज्यात मान्सूनची खरी दस्तक जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला घराबाहेर पडताना पूर्ण तयारीनेच पडावं लागणार आहे.

मान्सूनच्या आगमनापूर्वीच महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार आहे. येत्या 8 ते 12 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होणार आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून महाराष्ट्रात येण्यासाठी 20 दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत राज्यातील काही शहरांत तापमान जवळपास 44 अंशाच्या जवळ असणार आहे. परभणी आणि अकोल्यात तापमान 44 अंशावर जाण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील लोक आधीच उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच आता हवामान खात्यानेही उष्णेतेच्या लाटेचा अंदाज वर्तवल्याने या भागातील लोकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.

तीन दिवसात पाऊस

मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांची आजच्या दिवस का होईना उकाड्याच्या काहिलीतून सुटका झाली आहे. राज्यातील काही भागांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

वादळी वारे वाहणार

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमरावतीत पाऊस

विदर्भासह अमरावती जिल्ह्यात 24 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर कालअमरावती शहर, वलगावसह ग्रामीण भागात तुफान वादळी पाऊस झाला. विदर्भातील अमरावती, यवतमाळ ,वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना मात्र काही प्रमाणात उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.