AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP | शरद पवार यांच्या बारामती मतदारसंघाच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवार यांच्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये सहानुभूती?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आलीय. या बैठकीत बारामतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याबद्दल महत्त्वाचं मत मांडलंय.

NCP | शरद पवार यांच्या बारामती मतदारसंघाच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवार यांच्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये सहानुभूती?
| Updated on: Oct 18, 2023 | 9:05 PM
Share

मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मुंबईत आज महत्त्वाची बैठकही पार पडली. या बैठकीत अनेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही, असा निर्धार शरद पवारांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणारे केवळ ईडी, सीबीआयच्या भीतीने जाणारे लोक आहेत, असंही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीतीली इनसाईड स्टोरी समोर आलीय. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणं टाळलं पाहिजे”, असं मत काही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मांडलं. “पण टीका केली नाही तर आपण सोबत आहोत हा मेसेज जाईल”, अशी समज वरिष्ठांकडून या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचं मत पाहता अजित पवार यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयानंतरही पक्षात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असं चित्र दिसत आहे.

जयंत पाटील म्हणाले, ’15 आमदार संपर्कात’

बारामतीची लढाई ही बारामती विरुद्ध दिल्ली अशी आहे. या लढाईसाठी सज्ज राहण्याची सूचना या बैठकीत देण्यात आली. या सूचनेनंतर सुप्रिया सुळे यांच्यासाठी काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान, लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं. “अजित पवार गटातील 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज लोकसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक घेण्यात आली. कोल्हापूर, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमधील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. उद्या उर्वरित जिल्ह्यांचा आढावा घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत चांगली परिस्थिती आहे. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळी नावे आली आहेत. अनेक जण इच्छुक आहेत. चर्चा करून निर्णय घेतला जाईल”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

“फुटून गेलेल्या आमदारांपैकी अनेक जण संपर्कात आहे. परत घ्यायचं की नाही, त्याबाबत पवार साहेब निर्णय घेतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. अनेक पक्ष महाविकास आघाडीत येऊ इच्छितात. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करू आणि जागा वाटपाचा निर्णय घेऊ”, असं जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.