AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील तोडलेल्या जैन मंदिरात समाज बांधवांकडून पूजा…मंदिर पुन्हा बांधण्याचा निर्धार

बीएमसीने मंदिर पाडण्यासाठी नोटीस दिली होती. त्याविरोधात जैन समाजाने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णय येण्यापूर्वी मंदिर पाडण्यात आले. त्यामुळे जैन समाज आणि स्थानिक नेते संतप्त झाले.

मुंबईतील तोडलेल्या जैन मंदिरात समाज बांधवांकडून पूजा...मंदिर पुन्हा बांधण्याचा निर्धार
विले पार्ल येथील जैन मंदिर
| Updated on: Apr 20, 2025 | 12:27 PM
Share

मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर १६ एप्रिल रोजी मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. हे मंदिर महापालिकेने पाडले होते. त्यानंतर देशभरातील जैन समुदायाकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात शनिवारी जैन समाजाकडून रॅली काढण्यात आली. जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मनपा अधिकारी नवनाथ घाडगे यांचे निलंबन केले आहे. दरम्यान, जैन समाजाने मंदिराची जी जागा राहिली आहे त्या जागेवर पूजा अर्चा सुरु केली आहे.

जैन समाजाने शनिवारी रॅली काढली. जैन समाजाचा विरोधानंतर मुंबई मनपाने त्या ठिकाणी असलेले ढिगारे दूर केले आहेत. त्यानंतर रविवारी तुटलेल्या मंदिरात पूजा पाठ सुरु केला. मंदिराच्या सर्व भिंती तुटल्या आहेत. मंदिराला दरवाजेसुद्धा नाहीत. त्यानंतर जैन बांधवांनी त्या ठिकाणी पूजा सुरु केली आहे. महिलांनीही सकाळी येऊन पूजा केली. भगवान महावीर यांच्यासमोर भाविक नतमस्तक होत आहे. मंदिर तोडल्याचा संताप भाविकांमध्ये आहे. डोळ्यात आश्रू आहे. मंदिराच्या पुजारींनी म्हटले की, हा आमचा खूप मोठा विजय आहे. जोपर्यंत मंदिराचे काम पूर्ण होणार नाही, आम्ही शांत बसणार नाही. ज्यांनी मंदिर तोडले त्यांना कोणी माफ करणार नाही.

बीएमसीने मंदिर पाडण्यासाठी नोटीस दिली होती. त्याविरोधात जैन समाजाने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णय येण्यापूर्वी मंदिर पाडण्यात आले. त्यामुळे जैन समाज आणि स्थानिक नेते संतप्त झाले.

मंदिर तोडल्याच्या निषधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो महिला-पुरुष सहभागी झाले होते. सर्वांनी काळी पट्टी बांधून बीएमसीचा विरोध केला होता. मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत जैन समाजाची शनिवारी दोन तास बैठक चालली. त्यावेळी समाजाकडून एक निवेदन देण्यात आले. रेस्टॉरंट मालकाच्या सांगण्यावरुन मंदिर तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. मंदिर तोडल्यानंतर जैन समाजाचे लोक त्या ठिकाणी पोहचले आणि मूर्ती एका चबुतरावर ठेऊन पूजा केली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.