AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीला किती जागा मिळणार?, संजय राऊत यांनी सांगितला पहिल्यांदाच आकडा

आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला किती जागा मिळणार आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळणार याचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जाहीरपणे आकडा सांगितंला आहे. टीव्ही9 मराठीच्या विशेष लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमात ते बोलत होते.

इंडिया आघाडीला किती जागा मिळणार?, संजय राऊत यांनी सांगितला पहिल्यांदाच आकडा
| Updated on: Mar 01, 2024 | 3:28 PM
Share

मुंबई : टीव्ही9 मराठीच्या ‘लोकसेभेचा महासंग्राम’ या कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये आगामी निवडणुकीबाबत अनेक प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरे दिलीत. यादरम्यान लोकसभा निवडणूकीमध्ये इंडिया आघाडीला किती जागा मिळणार यावर बोलताना संजय राऊत पहिल्यांदाच आकडा सांगितला. इतकंच नाहीतर 400 चा आकडा भाजप पार करेल असं मोदी यांनी म्हणाले होते. मात्र राऊत यांनी भाजपलाही किती जागा मिळणारा हासुद्धा आकडी जाहीरपणे सांगितला आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, एवढ्या जागांचं टार्गेट ठेवलं आहे. 220च्या पुढे भाजप जात नाही, भाजपचं सरकार येत नाही. देशाचा नकाशा समोर ठेवा आणि राज्यानुसार गणितं मांडा. कुठून आणणार भाजप जागा. उत्तर प्रदेशातील 80 जागा त्यांना मिळून द्या, छत्तीसगड, हरियाणा, तेलंगनातील सर्व जागा त्यांना घेऊ द्या भाजप 220च्या पुढे जाणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नितीश कुमार आज त्यांच्यासोबत आहे. उद्या पलटी मारेल. त्यांना पळण्याचा नाद आहे. एनडीए म्हणजे भाजप, शिवसेना आणि अकाली दल होतो. आता बाकी मुरमुरे कुरमुरे आहेत. इंडिया आघाडीच्या राज्यांचा विचार केला तर इंडिया आघाडी किमान 290 जागा जिंकेल. आप आणि काँग्रेसची युती झाली आहे. दिल्ली, गुजरात आणि हरयाणात झाली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस-आपची युती झाली नाही. पंजबामध्ये आप आणि काँग्रेसला जागा मिळाल्यावर इंडिया आघाडीला जागा मिळणार नाही. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी आणि काँग्रेसलाच जागा मिळेल, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान,  इंडिया आघाडीत अनेक चेहरे आहेत. राहुल गांधी खरगे आणि उद्धव ठाकरे आहेत. जागांचा विषय नाही. लीडरशीपचा विषय आहे. देश कुणाच्या नेतृत्वात पुढे जाईल हे महत्त्वाचं असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.