मराठ्यांचं आंदोलन ऑर्गेनिक आहे. त्यामुळेच त्यांचे 56 मोर्चे निघाले. नाही तर निघाले नसते. काही लोकांची सवय आहे, बहती गंगा में हाथ धोलो, खांदा मिळाला तर बंदूक चालवा. आमच्या विरोधकांनी तेच केलं. पण त्यात ते सक्सेस झाले नाहीत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. टीव्ही9 मराठीने लोकसभेचा महासंग्राम कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं आहे. त्यात ते बोलत होते.