AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?

महाराष्ट्राला कोरोनाच्या भीषण तडाख्यातून वाचवण्यासाठी आता ठाकरे सरकार अमरावती पॅटर्नच्या लॉकडाऊनची तयारी करत असल्याचे समजते. | Lockdown in Maharashtra

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 12, 2021 | 10:45 AM
Share

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे गुढीपाडव्यानंतर महाराष्ट्रात अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) करण्यात आला होता. या लॉकडाऊनंतर अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि मृतांचा आकडा कमी झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्राला कोरोनाच्या भीषण तडाख्यातून वाचवण्यासाठी आता ठाकरे सरकार अमरावती पॅटर्नच्या लॉकडाऊनची तयारी करत असल्याचे समजते. (CM Uddhav Thackeray may impose lockdown in Maharashtra after Gudi Padwa)

लॉकडाऊनचा अमरावती पॅटर्न नेमका काय आहे?

अमरावती पॅटर्नप्रमाणे लॉकडाऊन झाल्यास राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल, अशी आशा राज्य सरकारला आहे. त्यामुळे यामध्ये थोडेफार बदल करुन हाच पॅटर्न सरसकट वापरला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. यंदा देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी होणारा अमरावती हा बहुधा देशातील पहिला जिल्हा आहे. कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळात अमरावतीमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या लॉकडाऊनचा कालावधी आणखी 8 दिवसांनी वाढवण्यात आला. या हिशेबाने अमरावतीत 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आला.

या काळात अमरावती शहर आणि अचलपूर तालुका पूर्णपणे बंद होता. येथील कंटेन्मेंट झोनमधील लोकांना तर घराबाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली होती.मात्र, या 15 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अमरावतीमधील कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली. 1 फेब्रुवारीला अमरावतीमध्ये कोरोनाचे 92 रुग्ण होते. 5 फेब्रुवारीपर्यंत हा आकडा 233 वर पोहोचला. 10 फेब्रुवारीला रुग्णसंख्या 369 तर 20 फेब्रुवारीला अमरावतीमध्ये 1058 रुग्ण सापडले.

मात्र, 15 दिवसांच्या लॉकडाऊनंतर परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारली. लॉकडाऊनआधी आणि नंतर अमरावती चाचण्याचे प्रमाण सारखेच होते. लॉकडाऊपूर्वी दिवसाला 2500 ते 2600 चाचण्या केल्या जात असत. तेव्हा दिवसाला 900 रुग्ण पॉझिटिव्ह सापडत होते. मात्र, लॉकडाऊननंतर हे प्रमाण 300 ते 350 पर्यंत खाली आले. तर कोरोना पॉझिटिव्हिटी रेटदेखील 48 टक्क्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यामुळे महाराष्ट्रातही असाच लॉकडाऊन झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो, अशी आशा राज्य सरकारला आहे. संबंधित बातम्या:

मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग, कोव्हिड सेंटर्ससाठी BMC पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार

मुंबईकरांसाठी गरज असेल तिथे व्यवस्था, वरळी, कांजूरसह अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरसह, ICU बेडची सोय

6 Minutes Walk Test : टास्क फोर्सने कोरोना रुग्णासाठी सुचवलेली 6 मिनिटे वॉक टेस्ट नेमकी काय?

(CM Uddhav Thackeray may impose lockdown in Maharashtra after Gudi Padwa)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.