AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown : राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्या, विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलीय.

Maharashtra Lockdown : राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्या, विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
| Updated on: Apr 15, 2021 | 10:04 PM
Share

मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार आता 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी आदेश लागू असणार आहेत. अशावेळी राज्यातील गरीब जनता, हातावर पोट असणाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी एका आर्थिक पॅकेजचीही घोषणा केली आहे. मात्र या पॅकेजमध्ये समाजातील विविध घटकांना काहीच मिळालं नसल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली. महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनीही त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं म्हटलं. आता काँग्रेसचे नेते, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना त्याबाबत एक पत्र लिहिलं आहे. (Vijay Wadettiwar’s letter to Chief Minister Uddhav Thackeray)

कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही कठीण

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलीय. शिंपी, नाभिक, परीट, लोहार, कुंभार, चांभार, सुतार यांच्यासह उर्वरित बलुतेदारांना मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी विनंती वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. राज्यातील बारा बलुतेदारांच्या हातचा रोजगार हिरावला गेलाय. त्यामुळे त्यांच्या कुटुबांचं पालन पोषण करणंही कठीण होऊन बसलं आहे, असं वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. त्यामुळे शक्य होईल ती सर्व मदत करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील लॉकडाऊन अधिक कडक होणार

लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय. मात्र, राज्यातील विविध भागात रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आता अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय.

मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा राज्यातील विविध भागात रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला मार्केट, मुंबईतील लोकलमध्येही लोकांची वर्दळ पाहायला मिळाली. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येणार आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

संबंधित बातम्या :

‘कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

जामखेडच्या रुग्णालयातील उपचारपद्धती कोरोनावर फायदेशीर? विचार व्हावा, रोहित पवारांचं आवाहन

Vijay Wadettiwar’s letter to Chief Minister Uddhav Thackeray

Follow Us
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली..
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली...
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........