AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EVM ला मविआचा कडाडून विरोध; आमदारांनी शपथही घेतली नाही, आदित्य ठाकरे म्हणाले, मारकडवाडीत….

Mahavikas Aghadi on EVM : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना या नेत्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. वाचा सविस्तर...

EVM ला मविआचा कडाडून विरोध; आमदारांनी शपथही घेतली नाही, आदित्य ठाकरे म्हणाले, मारकडवाडीत....
महाविकास आघाडीचं विधिमंडळ परिसरात आंदोलनImage Credit source: tv9
| Updated on: Dec 07, 2024 | 1:17 PM
Share

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत झाली. अनेक संस्थांच्या पोलमध्ये अटीतटीची दिसणारी ही लढत निकालाच्या दिवशी मात्र एकतर्फी झाली. विधानसभेच्या या निवडणुतीत सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला समोरं जावं लागलं. यंदाच्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला. याचेच पडसाद आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्यात आलं.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात निवडणुकीच्या निकालानंतर मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पोलिसांकडून विरोध झाल्यानंतर हे मॉक पोलिंग मागे घेण्यात आलं. यानंतर सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. शरद पवार मारकडवाडीला जाणार आहेत. राहुल गांधी देखील या गावात येणार असल्याची माहिती आहे. आज विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याबद्दल भूमिका मांडण्यात आली. एखादं सरकार एवढ्या मतांनी निवडून येतं. जल्लोष पाहायला मिळतो. पण राज्यात दिसत नाही. मग प्रश्न हाच पडतो की हे जनतेने दिलेलं बहुमत आहे की ईव्हीएम- निवडणूक आयोगाने दिलेलं बहुमत आहे. तेव्हा मारकडवाडीतील लोकांनी मॉक पोल मागितला. तो होऊ दिला नाही. त्यामुळे जनतेचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही. उद्या आम्ही शपथ घेणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

मारकडवाडीत काही लोकांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. आम्ही जिंकलो आसेल तरी आज शपथ घेणार नाही. या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसत नाही. मारकडवाडीने बॅलेट पेपर वर निवडणुकी घेण्याचा निर्णय घेतला. यात निवडणूक आयोगाचा काय संबध आहे? पोलिसांचा काय संबध आहे? गावाने एखादा निर्णय घेतला तर लोकाशाही पध्दतीने आलेले सरकार वरवंटा पसरवण्याचे काम करत आहे. तर हे सरकार लोकशाही पद्धतीने आले नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

वरिष्टांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत. राज्यातील जनतेचे मत आहे हे सरकार जनमताने आलेले नाही. हे सरकार मतं चोरून आले आहे. सरकारने भूमिका घेतली पाहिजे, मॉक पोलींग होऊ द्यायाला पाहिजे होतं. मारकडवाडीमधील लोकांचं मत, जनभावना समजून घेतली पाहिजे होती, असं नाना पटोले म्हणालेत.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.