AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच वर्षांत मराठ्यांची संख्या वाढण्याऐवजी कशी कमी झाली ? नाना पटोले यांनी ठेवले बोट

Nana Patole | मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण फक्त निवडणुकीसाठी दिलं आहे. धनगर समाजाचंही तसंच केलं. दहा वर्ष त्यांची मते घेतली. संघ वनवासी कल्याण चालवते. ती संस्था धनगरांच्या विरोधात गेली.

पाच वर्षांत मराठ्यांची संख्या वाढण्याऐवजी कशी कमी झाली ? नाना पटोले यांनी ठेवले बोट
नाना पटोले
| Updated on: Mar 01, 2024 | 1:49 PM
Share

मुंबई | दि. 1 मार्च 2024 : दहा टक्के मराठा आरक्षण जेव्हा राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे सरकार आले तेव्हा का नाही आणले? हिंमत होती तर या ईडी आणि येड्याचं सरकारने त्यावेळी आरक्षण दिले पाहिजे होते. परंतु आता निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे तातडीने आरक्षण दिले आहे. हे कोर्टात टिकेल, हा मुख्यमंत्र्यांचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोडून काढला.

एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यात आलं. 15 नोव्हेंबर 2018 साली या 9 सदस्यीय समितीने अहवाल सादर केला. 5000 पानांचा हा अहवाल होता. या अहवालाच्या आधारे 30 नोव्हेंबर 2018 साली हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला आणि मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण दिले होते. त्यावेळी गायकवाड आयोगाने महाराष्ट्रात 30 टक्के मराठा असल्याचे म्हटले होते. आता शुक्रे आयोग म्हणतंय 28 टक्के मराठा आहे. पाच वर्षात मराठ्यांची संख्या वाढायला हवी होती की कमी व्हायला हवी होती? सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड अहवालातून त्रुटी दाखवून ज्या गोष्टी सांगितल्या त्याची अंमलबजावणी झालीच नाही.

हे आरक्षण निवडणुकीसाठी

मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचं काय बोलणं झालं ते जाहीर करावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपनं घेरलं. ते बोलायला तयार नाही. भाजपचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. आम्हालाही घेरलं जात आहे. मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण फक्त निवडणुकीसाठी दिलं आहे. धनगर समाजाचंही तसंच केलं. दहा वर्ष त्यांची मते घेतली. संघ वनवासी कल्याण चालवते. ती संस्था धनगरांच्या विरोधात गेली.

फडणवीस यांचा मी असाच एक इंटरव्ह्यू ऐकला. अजित पवार यांना सोबत घेणार नाही. अन्यथा लग्न करणार नाही. कोण म्हणालं. नाना पटोले म्हणाले होते का? फडणवीसच म्हणाले होते ना. हा त्यांचा खोटारडेप आहे. आमच्याकडे खोटारडेपणा नाही. आम्ही सोनिया गांधींचे शिष्य आमच्या रक्तात त्याग आहे. इव्हेंट करणं नौटंकी करणं हे आमचं काम नाही.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.