AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुण्याचे अंतर कमी होणार? दोन्ही शहरांमधील वाहतुकीचा वेळ 25 मिनिटांना वाचणार? काय आहे प्रकल्प?

Missing Link on pune mumbai: खोपालीत होणारा उंच केबल ब्रिजवर 250 किमी हवेचा परिणाम होणार नाही. पूल तयार करणारी कंपनी ॲफकॉन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर एस. परमसिवन म्हणतात, ज्या भागात या पुलाची निर्मिती होत आहे, त्या ठिकाणी 25 ते 30 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असतात.

मुंबई-पुण्याचे अंतर कमी होणार? दोन्ही शहरांमधील वाहतुकीचा वेळ 25 मिनिटांना वाचणार? काय आहे प्रकल्प?
Missing Link
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 09, 2024 | 4:30 PM
Share

मुंबई आणि पुणे शहर राज्यातील महत्वाची शहरे आहेत. दोन्ही शहरे राज्याच्या नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर हातभार लावतात. त्यामुळे या ठिकाणी पायभूत सुविधा निर्माण करण्यावर अधिकाअधिक भर दिली जाते. तसेच दोन्ही शहरांमधील वाहतूक अधिक जलद करण्याचा प्रयत्न असतो. आता पुणे-मुंबई रस्ते वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांचे 25 मिनिटे वाचणार आहे. जून 2025 सुरु होणाऱ्या मिसिंग लिंक प्रॉजेक्टमुळे दोन्ही शहरांमधील अंतरही कमी होणार आहेत.

काय आहे मिसिंग लिंक प्रॉजेक्ट

मुंबई-पुणे शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी देशातील सर्वात मोठा उंच केबल ब्रिज तयार केला जात आहे. दोन डोंगरांदरम्यान तयार होणारा केबल ब्रिज जमिनीपासून 183 मीटर उंच आहे. या पुलाचे काम आता 80 टक्के पूर्ण झाले आहे. सध्या खोपोली एग्झीट ते सिंहगड इंस्टिट्यूट दरम्यान अंतर 19 किमी आहे. हा पूल पूर्ण झाल्यावर हे अंतर केवळ 13.3 किमी राहणार आहे. यामुळे सहा किलोमीटर अंतर दोन्ही शहरांचे कमी होणार आहे.

मिसिंग लिंक प्रॉजेक्ट हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येत आहे. त्यासाठी 13.3 किमी लांब मार्ग बनवला जात आहे. त्यात दोन टनल आणि दोन केबल ब्रिज असणार आहे. 13.33 किमीपैकी 11 किमी लांब टनल आणि 2 किमीचा केबल ब्रिज असणार आहे. एमएसआरडीसीनुसार दोन्ही टनल खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या हे टनल फिनिशिंग करण्याचे काम सुरु आहे.

250 किमी हवाचे परिणाम नाही

खोपालीत होणारा उंच केबल ब्रिजवर 250 किमी हवेचा परिणाम होणार नाही. पूल तयार करणारी कंपनी ॲफकॉन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर एस. परमसिवन म्हणतात, ज्या भागात या पुलाची निर्मिती होत आहे, त्या ठिकाणी 25 ते 30 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असतात. जास्तीत जास्त वाऱ्याचा वेग 50 किमी आहे. पुलावर 100 किमी वेगाने वाहने धावू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुलाचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. या डिझाइनची विदेशात चाचणी करण्यात आली आहे. अधिक उंची आणि वेगवान वारे लक्षात घेऊन ही चाचणी करण्यात आली आहे. या ठिकाणी 250 किमी वेगाने वारे वाहिले तरी काहीच होणार नाही.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?