AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अडीच वर्षांत जी कामं झाली नाही ती गेल्या 5 महिन्यात झाली” शिंदे गटाच्या नेत्याने उद्धव ठाकरेंना लगावला टोला

अगोदर मंत्री, खासदार, आमदारांनाही मातोश्रीवर प्रवेश नव्हता. मात्र आता आमदार, खासदारांपासून जनसामान्यापर्यं मातोश्रीची दारं खुली असल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

अडीच वर्षांत जी कामं झाली नाही ती गेल्या 5 महिन्यात झाली शिंदे गटाच्या नेत्याने उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Raut-ThackerayImage Credit source: tv 9 Marathi
| Updated on: Dec 04, 2022 | 11:05 PM
Share

मुंबईः राज्यातील शेतकऱ्यांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, दीनदुबळ्यांच्या असतील या सगळ्यांची कामं गेल्या अडीच वर्षात जी कामं झाली नाहीत, ती आता या पाच महिन्यात झाली आहेत असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. राज्यातील जी कामं गेल्या अडीच वर्षात झाली नव्हती. त्या कामांना आता वेग आला आहे. गोरगरीबांची आणि शेतकऱ्यांची कामं गतीने होत असल्याचा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी मातोश्रीचा उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी मातोश्रीवर टीका करताना सांगितले की, गेल्या अडीच वर्षात मातोश्रीची दारं सगळ्यासाठी बंद होती, मात्र आता मातोश्रीची सगळी दार, सगळ्यांसाठी खुली आहेत.

अगोदर मंत्री, खासदार, आमदारांनाही मातोश्रीवर प्रवेश नव्हता. मात्र आता आमदार, खासदारांपासून जनसामान्यापर्यं मातोश्रीची दारं खुली असल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना त्यांनी आता राज्यातील सगळ्यांना माहिती आहे की, सगळ्यांची सकाळ कोण खराब करते असा टोला संजय राऊत यांना लगावला आहे. त्यांचे नाव न घेता सगळ्यांची सकाळ कोण खराब करते असा सवाल करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीआहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....