AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिंदू’विरोधी फेसबुक पोस्टमुळे मुंबईतील डॉक्टरला बेड्या

मुंबई : फेसबुकवर सातत्याने हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट शेअर करत असल्याने मुंबईतील होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार निषाद असे 38 वर्षीय डॉक्टरचे नाव आहेत. डॉ. सुनील कुमार निषाद यांच्यावर बुधवारी दुपारी मुंबईतील सत्र न्यायालयाच्या बाहेरुन अटकेची कारवाई करण्यात आली. धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत डॉ. सुनील कुमार निषाद यांच्याविरोधात रवींद्र तिवारी […]

'हिंदू'विरोधी फेसबुक पोस्टमुळे मुंबईतील डॉक्टरला बेड्या
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

मुंबई : फेसबुकवर सातत्याने हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट शेअर करत असल्याने मुंबईतील होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार निषाद असे 38 वर्षीय डॉक्टरचे नाव आहेत. डॉ. सुनील कुमार निषाद यांच्यावर बुधवारी दुपारी मुंबईतील सत्र न्यायालयाच्या बाहेरुन अटकेची कारवाई करण्यात आली.

धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत डॉ. सुनील कुमार निषाद यांच्याविरोधात रवींद्र तिवारी नामक व्यक्तीने शनिवारी मुंबईतील विक्रोळीमधील पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आयपीसी कलम 295 (A) अंतर्गत डॉ. सुनील कुमार निषाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी आयपीसी कलम 295 (A) या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.

डॉ. निषाद यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारे रवींद्र तिवारी हे विक्रोळी भागातीलच रहिवाशी आहे. ते स्वत: सामाजिक कार्यकर्ते आहेत.

रवींद्र तिवारी यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, विक्रोळीतील पार्कसाईट पोलिसांनी निषाद यांचा शोध सुरु केला होता. मात्र, बुधवारी डॉ. निषाद हे मुंबई सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल करण्यासाठी आले. मात्र, त्याआधी सत्र न्यायालयाबाहेरच पोलिसांनी त्यांना अटक केली.

दरम्यान, डॉ. सुनील कुमार निषाद हे गेल्या दोन वर्षांपासून हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट फेसबुकवर शेअर करत असल्याचा आरोप रवींद्र तिवारी यांनी केला आहे. सहा महिन्यांआधी सुद्धा तिवारी यांनी डॉ. निषाद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.