AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू

Mumbai Ghatkopar building accident : मुंबईत पहिल्या पावसाचे दोन बळी; घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jun 26, 2023 | 8:34 AM
Share

मुंबई : पहिल्या पावसाने मुंबईत जलमय झाली आहे. अशातच काल मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. काल सकाळी ही इमारत कोसळली. यात चौघेजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील दोघांना कालच बाहेर काढण्यात यश आलं. पण या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांसाठी कालपासूनच बचाव कार्य सुरू होतं. आज या दोघांना बाहेर काढण्यात आलं. मात्र या दोघांचा मृत्यू झाला आहे. तसंच एक कुत्राही या इमारतीत अडकला होता. त्याचाही मृत्यू झाला आहे.

घाटकोपरमधील इमारत दुर्घटना

घाटकोपरमधल्या राजावाडी परिसरातील चित्तरंजनगरमध्ये काल सकाळी 9 वाजेच्या सुमारात इमारत कोसळली. राजावाडी कॉलनीमधील बिल्डिंग नंबर बी / 7 /166 ही तीन मजली इमारत कोसळली.

इमारतीच्या जमिनीचा काही भाग खचल्याने वरच्या तीन मजल्यांनाही तडे गेले. या इमारतीत 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. फायर ब्रिगेडचे जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यातील दोघांना कालच बाहेर काढण्यात यश आलं.

घाटकोपरमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना 21 तासांनंतर बाहेर काढण्यात आलं आहे. 21 तास चाललेल्या बचावाकार्यानंतर NDRF च्या टीमने या दोघांना बाहेर काढलं आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. नरेश पलांडे वय 56, अल्का महादेव पलांडे वय 94 अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. तसंच अडकलेल्या कुत्र्याचाही मृत्यू झालाय.

घाटकोपरमध्ये झालेल्या या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. या इमारत दु्र्घटनेमुळे तिथे लावण्यात आलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे.

अन् त्या महिलेचा जीव वाचला

पहिल्याच पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. अंधेरीतील सबवे परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. पाणी वेगाने पुढे सरकत होतं. अशात एक महिला रस्ता ओलांडू लागली. पण या पाण्याच्या वेगामुळे ती वाहून जाऊ लागली. पण इतक्यात तिथं असणारे लोक तिच्या मदतीला आले. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी महिलेचा अखेर जीव वाचला.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?