मुंबई बनले ‘हॉट’ शहर, दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान

| Updated on: Apr 17, 2024 | 11:26 AM

Maharashtra Heatwave Warning:मुंबईत मंगळवारी कमाल तापमान चार अंशानी वाढले होते. यापूर्वी २२ एप्रिल रोजी मुंबईमधील तापमान ३९ अंश सेल्यियसवर पोहचले होते. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले.

मुंबई बनले हॉट शहर, दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान
Follow us on

हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खर ठरला. मुंबई शहरातील गेल्या दहा वर्षांतील तापमानाचा उच्चांक नोंदवला गेला. मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूज केंद्रात सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले तर ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. या वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाई होत आहे.

चार अंशानी वाढले तापमान

मुंबईत मंगळवारी कमाल तापमान चार अंशानी वाढले होते. यापूर्वी २२ एप्रिल रोजी मुंबईमधील तापमान ३९ अंश सेल्यियसवर पोहचले होते. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले. मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढत आहे. यामुळे मुंबईकर कमालीचे त्रस्त झाले आहेत.

वाढत्या उन्हाचा पक्षांना फटका

वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांनाही फटका बसू लागला आहे. मुंबईमध्ये १ एप्रिलपासून सुमारे १०० हून अधिक पक्षी व प्राण्यांना उन्हाचा त्रास झाला आहे. एप्रिल महिन्यात सरासरी रोज १० पक्षी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. वाढत्या उन्हामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होते. यामुळे झाडावरून किंवा उडताना अचानक खाली पडून जखमी होत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत.

हे सुद्धा वाचा

मुंबईमध्ये एप्रिल महिन्यांत १०० हून अधिक पक्षी व प्राण्यांना उन्हाचा त्रास झाला आहे. त्यामध्ये ४० गायी आहेत. तसेच सुमारे ५८ पक्षी जखमी झाले आहेत. यामध्ये २२ कबूतर, १६ कावळे, एक पोपट, दोन मैना, १७ घारींचा वाढत्या उष्म्याने पक्षी त्रस्त समावेश आहे.

हवामान विभागाने दोन दिवस दिला होता इशारा

हवामान विभागाने मुंबई, रायगड, ठाणे शहरात १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानुसार या दोन्ही दिवस उष्णतेची लाट आली. सकाळी आणि रात्रीचे तापमान जास्त होते. यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.