AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा, IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट

Maharashtra Heatwave Warning: दोन दिवस सलग तापमान हे सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस ने अधिक वाढल्यास त्याला उष्णतेची लाट आल्याचे संबोधले जाते. यंदाच्या हंगामात उन्हाळा सुरु झाल्यापासून गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे.

मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा, IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट
temperature increases in mumbaiImage Credit source: TV9MARATHI
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Edited By: | Updated on: May 09, 2024 | 3:22 PM
Share

मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, ठाणे शहरात १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तापमान ३८ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे दुपारी बाहेर फिरणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मुंबई वाढत्या उन्हामुळे नागरिकांना घामाच्या धारा निघत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

सुरक्षेशिवाय उन्हात फिरु नका

मुंबई, रायगड, ठाणे शहरात १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानुसार सोमवारी नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवला. संध्याकाळनंतर तापमान कमी झाले नव्हते. महाराष्ट्रातील या तीन जिल्ह्यांसोबत देशातील काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. त्यात गोवा, ओडिशामध्ये १५ आणि १६ एप्रिल रोजी हीट वेव असणार आहे. १७ आणि १८ रोजी तेलंगणामध्ये उष्णतेची लाट असणार आहे. आंध्र प्रदेशात १६ ते १८ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येणार आहे.

सुरक्षेशिवाय उन्हात फिरू नका

उष्णता वाढत असल्याने नागरिकांना उलटी, चक्कर, निर्जलीकरण, बेशुद्ध पडणे, उष्माघात असा त्रास होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे सुरक्षेशिवाय उन्हामध्ये बाहेर पडू नका, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

सतत पाण्याचे सेवन करा

उन्हामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी सतत पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे सर्वात महत्वाचे आहे.

उष्णतेची लाट कधी म्हणतात

दोन दिवस सलग तापमान हे सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस ने अधिक वाढल्यास त्याला उष्णतेची लाट आल्याचे संबोधले जाते. यंदाच्या हंगामात उन्हाळा सुरु झाल्यापासून गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेमुळे होणारे आजार, उष्माघात सारखे प्रकार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक