AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Rain: आनंदवार्ता, यंदा मान्सून मनसोक्त बरसणार, हवामान विभागाचा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

Monsoon Rain: भारतात मान्सूनचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर आहे. देशातील जवळपास 50 टक्के शेती मान्सूनवर अवलंबून आहे. तसेच मान्सूनमुळे अनेक धरणांचा जलसाठा अवलंबून आहे. मागील वर्षी दमदार पाऊस न झाल्यामुळे त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला होता.

Monsoon Rain: आनंदवार्ता, यंदा मान्सून मनसोक्त बरसणार, हवामान विभागाचा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज
Monsoon Rain
| Edited By: | Updated on: May 09, 2024 | 3:25 PM
Share

मागील वर्षे मान्सूनने देशातील अनेक भागांत तूट निर्माण केली. सरासरीपेक्षाही कमी पाऊस बरसला. परंतु यंदा मान्सून मनसोक्त बसरणार आहे. संपूर्ण देशांत ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान दमदार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त असणार असल्याचे म्हटले आहे. मान्सून दीर्घ-काळाच्या सरासरीच्या (८७ सेंमी.) १०६ टक्के असेल, असा अंदाज आयएमडीकडून व्यक्त केला आहे. ‘ला निना’च्या अनुकूल परिस्थितीमुळे पाऊस चांगला होणार असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी दिली.

एम. रविचंद्रन यांनी सांगितले की, 1951 ते 2023 पर्यंतचा माहिती तपासल्यानंतर देशात नऊ वेळा मान्सून सामान्य राहिल्याचे दिसून आले आहे. ला नीनाच्या प्रभावामुळेच असे झाले आहे. 1971 ते 2020 दरम्यानच्या आकडेवारीनुसार यंदा दीर्घ-काळ सामान्य पावसाचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊस पडणार आहे.

देशात ८० टक्के भागांत सरासरीहून जास्त पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी सांगितले की, यंदा देशातील ८० टक्के भागांत सरासरीहून जास्त पाऊस पडणार आहे. देशातील ४ राज्यांत कमी पाऊस असणार आहे. अल नीनाच्या प्रभावामुळे गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होतो. आता त्याचा प्रभाव ओसरला आहे. अल नीना ऐवजी आता ला नीनाचा प्रभाव प्रशांत महासागरात निर्माण झाला आहे.

मागील वर्षी अल नीनामुळे 820 मिमी पाऊस झाला होता. हा पाऊस सरासरीपेक्षा कमी होता. देशात 868.6 मिमी पाऊस सरासरी इतका आहे. 2023 पूर्वी सलग चार वर्ष सामान्य पाऊस झाला होता. प्रशांत महासागराचे तापमान 30 वरून 18 अंश सेल्सिअस झाले आहे. यामुळे आता तिकडून इकडे वारे वाहत आहे. त्याचा फायदा भारतातील मान्सूनसाठी होणार आहे.

मान्सूनचा अर्थव्यवस्थेवर प्रभाव

भारतात मान्सूनचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर आहे. देशातील जवळपास 50 टक्के शेती मान्सूनवर अवलंबून आहे. तसेच मान्सूनमुळे अनेक धरणांचा जलसाठा अवलंबून आहे. मागील वर्षी दमदार पाऊस न झाल्यामुळे त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला होता.

गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.