AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : ‘त्याची मी माफी मागितली’ वर्ल्ड कप संपल्यानंतर सूर्यकुमारचा टीम इंडियातील खेळाडूबद्दल मोठा खुलासा

Suryakumar Yadav : टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता सूर्यकुमार यादवने एक मोठा खुलासा केला आहे. रविवारीच टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियातील एक खेळाडू रागवला होता असं सूर्याने सांगितलं.

Suryakumar Yadav : 'त्याची मी माफी मागितली' वर्ल्ड कप संपल्यानंतर सूर्यकुमारचा टीम इंडियातील खेळाडूबद्दल मोठा खुलासा
Suryakumar Yadav
| Updated on: Mar 12, 2026 | 2:30 PM
Share

टीम इंडियाने मागच्या रविवारी आयसीसी टी20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपला गवसणी घातली. या विजयानंतर भारतात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कप संपल्यानंतर आता मोठा खुलासा केला आहे. टी20 वर्ल्ड कप सुरु असताना टीम इंडियातील एक खेळाडू रागवला होता असं सूर्या बोलला. आयसीसी टी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम मधून वगळल्यामुळे उपकर्णधार अक्षर पटेल रागवला होता असं सूर्यकुमार यादव म्हणाला. भारताने सलग दुसऱ्यांदा आणि आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकलाय.

भारताने यंदा टी20 वर्ल्ड कप उंचावण्यासाठी नऊ सामने खेळले. त्यात दोन सामन्यात टीमचा उपकर्णधार असूनही अक्षर पटेलला वगळण्यात आलं होतं. अक्षर हे आवडलं नव्हतं. सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्वाच्या सामन्यावेळी अक्षर पटेलला टीममधून वगळलं होतं. टीम इंडियाने 76 धावांनी हा सामना गमावला. चाहते आणि क्रिकेट एक्सपर्ट्सनी या निर्णयावर टीका केली होती. अक्षर वगळण्याचा हा टीमचा रणनितीक निर्णय होता. पण अक्षर पटेलला हा निर्णय पटला नव्हता. आता वर्ल्ड कप संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने या बद्दल खुलासा केला आहे.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

“अक्षर खूप रागावलेला. त्याने रागावलं सुद्धा पाहिजे कारण तो टीममधील अनुभवी खेळाडू आहे. तो आयपीएलमध्ये एका टीमचं नेतृत्व करतो. तो रागावलेला. मी त्याची माफी मागितली. मी म्हटलं त्याला मी चुकलो. पण संघासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता” असं सूर्युकमार यादव इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला. अक्षर पटेल सोबतचा हा संवाद इतक सहज, सोपा नव्हता असं सूर्या म्हणाला.

“भारत-दक्षिण आफ्रिका आमच्यासाठी डोळे उघडणारी मॅच होती. मला टीमवर अजिबात डाऊट नव्हता. त्यानंतर आम्ही प्रत्येक सामना बादफेरीची मॅच असल्यासारखे खेळलो” असं सूर्यकुमार यादवने सांगितलं. झिम्बाब्वे विरुद्धचा सामना आमच्यासाठी प्री-क्वार्टर फायनल आणि वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच क्वार्टर फायनल होती.

Follow Us
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.