AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : ‘त्याची मी माफी मागितली’ वर्ल्ड कप संपल्यानंतर सूर्यकुमारचा टीम इंडियातील खेळाडूबद्दल मोठा खुलासा

Suryakumar Yadav : टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता सूर्यकुमार यादवने एक मोठा खुलासा केला आहे. रविवारीच टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियातील एक खेळाडू रागवला होता असं सूर्याने सांगितलं.

Suryakumar Yadav : 'त्याची मी माफी मागितली' वर्ल्ड कप संपल्यानंतर सूर्यकुमारचा टीम इंडियातील खेळाडूबद्दल मोठा खुलासा
Suryakumar Yadav
| Updated on: Mar 12, 2026 | 2:30 PM
Share

टीम इंडियाने मागच्या रविवारी आयसीसी टी20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपला गवसणी घातली. या विजयानंतर भारतात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कप संपल्यानंतर आता मोठा खुलासा केला आहे. टी20 वर्ल्ड कप सुरु असताना टीम इंडियातील एक खेळाडू रागवला होता असं सूर्या बोलला. आयसीसी टी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम मधून वगळल्यामुळे उपकर्णधार अक्षर पटेल रागवला होता असं सूर्यकुमार यादव म्हणाला. भारताने सलग दुसऱ्यांदा आणि आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकलाय.

भारताने यंदा टी20 वर्ल्ड कप उंचावण्यासाठी नऊ सामने खेळले. त्यात दोन सामन्यात टीमचा उपकर्णधार असूनही अक्षर पटेलला वगळण्यात आलं होतं. अक्षर हे आवडलं नव्हतं. सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्वाच्या सामन्यावेळी अक्षर पटेलला टीममधून वगळलं होतं. टीम इंडियाने 76 धावांनी हा सामना गमावला. चाहते आणि क्रिकेट एक्सपर्ट्सनी या निर्णयावर टीका केली होती. अक्षर वगळण्याचा हा टीमचा रणनितीक निर्णय होता. पण अक्षर पटेलला हा निर्णय पटला नव्हता. आता वर्ल्ड कप संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने या बद्दल खुलासा केला आहे.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

“अक्षर खूप रागावलेला. त्याने रागावलं सुद्धा पाहिजे कारण तो टीममधील अनुभवी खेळाडू आहे. तो आयपीएलमध्ये एका टीमचं नेतृत्व करतो. तो रागावलेला. मी त्याची माफी मागितली. मी म्हटलं त्याला मी चुकलो. पण संघासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता” असं सूर्युकमार यादव इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला. अक्षर पटेल सोबतचा हा संवाद इतक सहज, सोपा नव्हता असं सूर्या म्हणाला.

“भारत-दक्षिण आफ्रिका आमच्यासाठी डोळे उघडणारी मॅच होती. मला टीमवर अजिबात डाऊट नव्हता. त्यानंतर आम्ही प्रत्येक सामना बादफेरीची मॅच असल्यासारखे खेळलो” असं सूर्यकुमार यादवने सांगितलं. झिम्बाब्वे विरुद्धचा सामना आमच्यासाठी प्री-क्वार्टर फायनल आणि वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच क्वार्टर फायनल होती.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन.