AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : मुंबईकरांनो सावध व्हा! सलग तिसऱ्या दिवशी मुंबईची हवा दिल्लीपेक्षा खराब

. मुंबईने दिल्लीला मागे टाकत सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक प्रदूषित शहर बनले (Mumbai air pollution) आहे. मंगळवारपर्यंत, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 113 वर नोंदवला गेला. त्यानंतर ते शुक्रवारी सकाळी ते 161 पर्यंत वाढले, जे दिल्लीपेक्षा वाईट होते.

Mumbai : मुंबईकरांनो सावध व्हा! सलग तिसऱ्या दिवशी मुंबईची हवा दिल्लीपेक्षा खराब
मुंबई प्रदुषणImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 20, 2023 | 9:45 AM
Share

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई दिवसेंदिवस राजधानी दिल्लीला प्रदूषणाच्या बाबतीत मागे टाकत आहे. मुंबईने दिल्लीला मागे टाकत सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक प्रदूषित शहर बनले (Mumbai air pollution) आहे. मंगळवारपर्यंत, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 113 वर नोंदवला गेला. त्यानंतर ते शुक्रवारी सकाळी ते 161 पर्यंत वाढले, जे दिल्लीपेक्षा वाईट होते. गुरुवारी सकाळपर्यंत दिल्लीचा AQI 117 च्या ‘मध्यम’ श्रेणीत होता. शेतातील कचरा जाळणे आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे दिल्ली हे नेहमीच जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक राहिले आहे. येथे सर्वाधिक प्रदूषण साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात होते आणि दिवाळीच्या आसपास धोकादायक पातळी गाठते. गेल्या काही वर्षांत दिल्ली सरकार या समस्येसाठी हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना जबाबदार धरत आहे.

मुंबईला धुक्याचं पांघरूण

कृषीप्रधान राज्यांमध्ये, शेतकऱ्यांमधील शेतात जाळण्याची प्रथा दूर करण्याचे मार्ग शोधण्याचे काम सातत्याने सुरू आहे. मुंबईला धुक्याच्या पांघरूणांनी झाकले आहे, ज्यामुळे ते AQI मध्ये नवी दिल्लीला मागे टाकत आहे. महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मुंबईत सुरू असलेले बांधकाम प्रकल्प, जसे की मेट्रोचे काम, मोठ्या प्रमाणावर धूळ प्रदूषणात योगदान देत आहे.

ते म्हणाले की, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शहरभर फॉगिंग मशिन बसवण्यात येत आहेत. याशिवाय धुक्यामुळे मुंबई लोकललाही उशीर झाल्याचे समोर आले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, ‘मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील वासिंद आणि टिटवाळा दरम्यान सकाळी 6.30 ते सकाळी 9 आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि बदलापूर ठाणे दरम्यान पहाटे 5.30 वाजेपर्यंत. रात्री नऊ वाजेपर्यंत धुके कायम होते.

AQI- एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे काय, ते कसे काम करते?

एअर क्वालिटी इंडेक्स किंवा हवा गुणवत्ता निर्देशांक ही एक संख्या आहे ज्याद्वारे हवेची गुणवत्ता निर्धारित केली जाते. यासोबतच भविष्यातील प्रदूषणाची पातळीही जाणून घेतली जाते.

प्रत्येक देशाचा हवा गुणवत्ता निर्देशांक तेथे आढळणाऱ्या प्रदूषणाच्या घटकांवर अवलंबून असतो. भारतात, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने AQI लाँच केले होते. हे ‘एक नंबर, एक रंग, एक वर्णन’ या तत्त्वावर सुरू करण्यात आले होते. खरे तर देशात सुशिक्षित नसलेली लोकसंख्या मोठी आहे, त्यामुळे त्यांना प्रदूषणाचे गांभीर्य समजावे म्हणून त्यात रंगांचाही समावेश करण्यात आला.

AQI त्याच्या मानांकणाच्या आधारे सहा श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. 0 आणि 50 मधील AQI चांगले, 51 आणि 100 समाधानकारक, 101 आणि 200 मध्यम, 201 आणि 300 खराब, 301 आणि 400 धोकादायक आणि 401 आणि त्यावरील अतिशय धोकादाय मानले जातात.

भारतातील AQI आठ प्रदूषण घटकांच्या (PM10, PM 2.5, NO2, SO2, CO2, O3, NH3 आणि Pb) आधारावर निर्धारित केले जाते. गेल्या 24 तासांतील या घटकांच्या प्रमाणावर आधारित हवेची गुणवत्ता सांगते. त्यासाठी कोणत्याही शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ते बसवले जाते. त्याच्या वाचनाच्या आधारे, लोकांना आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली जातात.

आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत.
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न.
भाजप-राष्ट्रवादीचं सरकार दादांची इच्छा होती! तटकरेंचा मोठा खुलासा
भाजप-राष्ट्रवादीचं सरकार दादांची इच्छा होती! तटकरेंचा मोठा खुलासा.
गॅस टँकर पलटी; पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
गॅस टँकर पलटी; पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी.
प्रत्येक मेसेजला उत्तर देणारे दादा.. अजित पवारांचा शेवटचा कॉल आला समोर
प्रत्येक मेसेजला उत्तर देणारे दादा.. अजित पवारांचा शेवटचा कॉल आला समोर.
त्यांच्या शपथविधीवर भाष्य करायचं नाही! शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
त्यांच्या शपथविधीवर भाष्य करायचं नाही! शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं.
देश विकायला काढताना मोदी कोणाशी बोलत होते? राऊतांचा खोचक प्रश्न
देश विकायला काढताना मोदी कोणाशी बोलत होते? राऊतांचा खोचक प्रश्न.
गर्दीवेळी एक्स्प्रेसना नो एन्ट्री! मध्य रेल्वेचा निर्णय
गर्दीवेळी एक्स्प्रेसना नो एन्ट्री! मध्य रेल्वेचा निर्णय.
8:37 ला शेवटा तो फोन अन् 8:46 ला विमान अपघात! अजितदादांचं शेवटंच बोलणं
8:37 ला शेवटा तो फोन अन् 8:46 ला विमान अपघात! अजितदादांचं शेवटंच बोलणं.
देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार काय? शरद पवार भडकले
देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार काय? शरद पवार भडकले.