AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नरेंद्र मोदी यांच्यावर वाईट वेळ होती तेव्हा…;” उद्धव ठाकरे यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. राजधर्माचं पालन झालं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे होते, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी यांच्यावर वाईट वेळ होती तेव्हा...; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' प्रसंग
उद्धव ठाकरे
| Updated on: Feb 12, 2023 | 6:43 PM
Share

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी सुभाष देसाई, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी, सुनील प्रभू हेही उपस्थित होते. उत्तर भारतीयांशी बोलताना मन की बात नको, दिल की बात हवी, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. उत्तर भारतीयांशी नातं मजबूत करायला आलो असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. ऐकमेकांचा द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व नव्हे, असंही ते म्हणाले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर वाईट वेळ होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा बचाव केला होता, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. राजधर्माचं पालन झालं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे होते, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हिंदुत्वाची साथ सोडली नाही

२०१४ मध्ये त्यांनी युती तुटली. आम्ही भाजपची साथ सोडली. हिंदुत्वाची साथ सोडली नाही. एकदुसऱ्या विरोधात भाजपचे नेते लढवत आहेत. असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

तुमची मदत हवी आहे

मला तुमची मदत हवी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात केलं. गळात पट्टा बांधून गुलामी करणं हे शिवसेनाप्रमुखांनी मला शिकविलं नाही. मी महाविकास आघाडीत गेलो, याचा अर्थ मी हिंदुत्व सोडलं असा होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बोहरा समाजाच्या किचनमध्ये पंतप्रधान मोदी यांनी रोटी शेकली. तर काही नाही. पण, हेचं मी केले असते तर मला विरोध केला असता असंही ठाकरे म्हणाले. पाहण्याचा चष्मा बदलविला गेला पाहिजे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसैनिकांच रक्त कुणाला जात हे पाहत नाही

आमच्या मनात प्रत्येकांच चांगलं व्हावं, असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्री असताना कोरोनाचं संकट आलं होतं. अंधार दिसत होता. पण, मी माझं कर्तव्य बजावलं. शिवसैनिक रक्तदान करतात. तेव्हा ते रक्त कुणाला जातं हे आम्ही पाहतं नाही. ते उपयोगी होते की, नाही, यवढंच बघीतलं जात.

हे घोड्याला मिठी मारायला सांगतील

एकदुसऱ्यांशी लढवत ठेवायचं हे आमचं हिंदुत्व नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. आम्ही घोड्यावर बसून राहू. तुम्ही घोड्याच्या लाता खा. आम्ही घोड्यावर बसून राहू. काऊ हग डे होणार होतं. तसं उद्या हे घोड्याला मिठी मारायला सांगतील, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.