देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात गव्हर्नर अपयशी ठरले तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडेल: राष्ट्रवादी

| Updated on: Jun 05, 2021 | 12:40 PM

देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं विधान केलं आहे. (nawab malik raise questions on slowdown economy)

देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात गव्हर्नर अपयशी ठरले तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडेल: राष्ट्रवादी
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई: देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं विधान केलं आहे. रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, अशी भीती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. (nawab malik raise questions on slowdown economy)

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशाचा जीडीपी 7.5 टक्के मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळलं पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे? असा सवालही मलिक यांनी केला. रिझर्व्ह बॅंकेने कबूल केले आहे हे चांगलं आहे परंतु आकलन चुकत असेल तर हे देशासाठी सारखं सारखं चांगलं राहणार नाही, असंही ते म्हणाले.

निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट नको

यावेळी मलिक यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात 12 कोटी, डिसेंबरपर्यंत 210 कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला.

लस किती मिळणार जाहीर करा

राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार याची माहिती दिली पाहिजे. केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करून त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. कधी प्रकाश जावडेकर वेगळं बोलतात तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात. फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सत्यता देशासमोर ठेवा

12 कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता मात्र आजपर्यंत किती पुरवठा झाला असा सवाल करतानाच कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा अशी मागणीही त्यांनी केली. (nawab malik raise questions on slowdown economy)

 

संबंधित बातम्या:

शंभर टक्के सांगतो ‘ती’ चूकच होती, पण…; पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

राज-उद्धव एकत्र येणार का, राज म्हणाले परमेश्वराला ठाऊक, आता संजय राऊतांचं मोठं विधान

‘त्या’ विद्यार्थ्यांचा कॅनडा, अमेरिका, जपानला शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा; ठाणे पालिकेचं ‘वॉक इन’ लसीकरण

(nawab malik raise questions on slowdown economy)