AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil : एकनाथ शिंदे यांना परत जाण्यास संधी, जयंत पाटील यांची टोलेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते हे सत्तेत सहभागी झाले. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण नव्हते. आमचं धोरण हे महाविकास आघाडीसोबत राहण्याचं होतं.

Jayant Patil : एकनाथ शिंदे यांना परत जाण्यास संधी, जयंत पाटील यांची टोलेबाजी
| Updated on: Jul 02, 2023 | 7:58 PM
Share

मुंबई : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शिवाय अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त पैसे देत होते. तरीही उद्धव ठाकरे काही बोलत नव्हते. त्यामुळे ठाकरे गटापासून बाहेर पडल्याचे शिंदे गटाचे नेते सांगत होते. तेच अजित पवार आता पुन्हा सत्तेत सोबत आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलंय. जयंत पाटील म्हणाले, आजच्या घडामोडीनंतर हे कळलं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते हे सत्तेत सहभागी झाले. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण नव्हते. आमचं धोरण हे महाविकास आघाडीसोबत राहण्याचं होतं.

राष्ट्रवादीचे अनेक नेते, पदाधिकारी शरद पवार यांच्या पाठिशी उभे आहेत. अशी संकट येतात तेव्हा शरद पवार पुन्हा ताकदीने पुढं येतात. उद्या शरद पवार हे कराड येथे यशवंत चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. यशवंत चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन करताना या राज्याचं राजकारण बेरजेचं असलं पाहिजे. राज्यात शाहू, फुले, आंबेडकर यांचे राजकारण पुढे जाईल, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.

जयंत पाटील यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा अजित पवार हे अर्थमंत्री होते. त्यांच्यामुळे आमच्यावर अन्याय झाला. म्हणून आम्ही तिकडे चाललो, असं शिंदे यांनी सांगितलं होतं. आता हेच सगळ्या तिकडे गेले असतील, तर एकनाथ शिंदे यांना परत जायला एक संधी आहे.

जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते

अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यास आमच्या लक्षात आलं. हा निर्णय पक्षाला कळवला असता तर योग्य झालं असतं. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी शरद पवार यांच्या मान्यतेने जितेंद्र आव्हाड यांनी सोपवत असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हंटलं.

योग्य ती पाऊलं उचलू

दोन-तीन वाजता शपथविधी झाला. या घटना घडतील, असं कुणी गृहित धरलं नव्हतं. आता कुणी पक्षाच्या निर्णयाचे उल्लंघन केलं हे कळलं आहं. आता यासंदर्भात पक्षाच्या स्तरावर योग्य तो विचारविनिमय करून योग्य ती पाऊलं टाकू.

त्यावेळी महाविकास आघाडीची ताकत कळेल

विधानसभेच्या निवडणुकीला वर्ष सव्वा वर्ष राहिलाय. ही विधानसभा वर्ष दीड वर्षानं बंद होणार आहे. नव्या निवडणुका लागणार आहे. लोकांच्या पाठिंब्याने निवडणुका होतात. राज्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यासोबत राहण्याची लोकांची भूमिका आहे. निवडणुकीत दर पाच वर्षांची चित्र बदलंत. त्यावेळी महाविकास आघाडीची ताकत किती आहे, हे तुम्हाला नक्की कळेल, असंही जयंत पाटील यांनी म्हंटलं.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.