AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil : एकनाथ शिंदे यांना परत जाण्यास संधी, जयंत पाटील यांची टोलेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते हे सत्तेत सहभागी झाले. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण नव्हते. आमचं धोरण हे महाविकास आघाडीसोबत राहण्याचं होतं.

Jayant Patil : एकनाथ शिंदे यांना परत जाण्यास संधी, जयंत पाटील यांची टोलेबाजी
| Updated on: Jul 02, 2023 | 7:58 PM
Share

मुंबई : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शिवाय अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त पैसे देत होते. तरीही उद्धव ठाकरे काही बोलत नव्हते. त्यामुळे ठाकरे गटापासून बाहेर पडल्याचे शिंदे गटाचे नेते सांगत होते. तेच अजित पवार आता पुन्हा सत्तेत सोबत आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलंय. जयंत पाटील म्हणाले, आजच्या घडामोडीनंतर हे कळलं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते हे सत्तेत सहभागी झाले. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण नव्हते. आमचं धोरण हे महाविकास आघाडीसोबत राहण्याचं होतं.

राष्ट्रवादीचे अनेक नेते, पदाधिकारी शरद पवार यांच्या पाठिशी उभे आहेत. अशी संकट येतात तेव्हा शरद पवार पुन्हा ताकदीने पुढं येतात. उद्या शरद पवार हे कराड येथे यशवंत चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. यशवंत चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन करताना या राज्याचं राजकारण बेरजेचं असलं पाहिजे. राज्यात शाहू, फुले, आंबेडकर यांचे राजकारण पुढे जाईल, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.

जयंत पाटील यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे जेव्हा भाजपसोबत गेले तेव्हा अजित पवार हे अर्थमंत्री होते. त्यांच्यामुळे आमच्यावर अन्याय झाला. म्हणून आम्ही तिकडे चाललो, असं शिंदे यांनी सांगितलं होतं. आता हेच सगळ्या तिकडे गेले असतील, तर एकनाथ शिंदे यांना परत जायला एक संधी आहे.

जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते

अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यास आमच्या लक्षात आलं. हा निर्णय पक्षाला कळवला असता तर योग्य झालं असतं. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी शरद पवार यांच्या मान्यतेने जितेंद्र आव्हाड यांनी सोपवत असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हंटलं.

योग्य ती पाऊलं उचलू

दोन-तीन वाजता शपथविधी झाला. या घटना घडतील, असं कुणी गृहित धरलं नव्हतं. आता कुणी पक्षाच्या निर्णयाचे उल्लंघन केलं हे कळलं आहं. आता यासंदर्भात पक्षाच्या स्तरावर योग्य तो विचारविनिमय करून योग्य ती पाऊलं टाकू.

त्यावेळी महाविकास आघाडीची ताकत कळेल

विधानसभेच्या निवडणुकीला वर्ष सव्वा वर्ष राहिलाय. ही विधानसभा वर्ष दीड वर्षानं बंद होणार आहे. नव्या निवडणुका लागणार आहे. लोकांच्या पाठिंब्याने निवडणुका होतात. राज्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यासोबत राहण्याची लोकांची भूमिका आहे. निवडणुकीत दर पाच वर्षांची चित्र बदलंत. त्यावेळी महाविकास आघाडीची ताकत किती आहे, हे तुम्हाला नक्की कळेल, असंही जयंत पाटील यांनी म्हंटलं.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....