AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवतीर्थावर इंडिया आघाडीचे शक्ती प्रदर्शन, बड्या नेत्याची एन्ट्री, राहुल गांधींना जेवणाचेही आमंत्रण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याया यात्रेची समारोप सभा मुंबईमध्ये शिवतीर्थावर होणार आहे. रविवारी होणाऱ्या या सभेमध्ये राज्यातील बडा नेते इंडिया आघाडीच्या मंचावर दिसणार आहे. कोण आहेत ते नेते? ज्यांनी राहुल गांधींना जेवणासाठीही निमंत्रण दिलं आहे.

शिवतीर्थावर इंडिया आघाडीचे शक्ती प्रदर्शन, बड्या नेत्याची एन्ट्री, राहुल गांधींना जेवणाचेही आमंत्रण
| Updated on: Mar 16, 2024 | 10:14 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी मुंबईमध्ये समारोप होणार आहे. मुंबईतील शिवतीर्थावर इंडिया आघाडी मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे. या समारोप यात्रेला इंडिया आघाडीचे बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहत आपली ताकद दाखवून देणार आहेत. राज्यातील बडा नेता या मंचावर दिसणार आहे. नेमके कोण आहेत जाणून घ्या.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूरपासून निघाली होती. तब्बल 6700 किमी अंतर पार करत ही यात्रा मुंबईतील चैत्यभूमीवर समाप्त झाली. मुंबईमध्ये भिवंडीतून सुरू झालेली यात्रा कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप, सायन, धारावीतून दादर येथील चैत्यभूमीवर आली होती. यावेळी राहुल गांधी यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यासोबतच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनही केलं. आता शिवाजी पार्कवर इंडिया आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरूवात करेल.

राहुल गांधी यांच्या समारोप सभेला इंडिया आघाडीच्या मंचावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित असणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीकडून निमंत्रण आलं असून याबाबत त्यांनी ट्विटरवर (एक्स) माहिती दिली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिलेले भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण मला मिळाले आहे. मी काल निमंत्रण स्वीकारले आहे आणि 17 मार्चला शिवाजी पार्क, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तसेच 17 मार्चला मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना राजगृह येथे भोजनाचे निमंत्रण दिल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

Follow Us
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच...
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच....
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.