AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसाद लाड म्हणाले, हे निव्वळ राजकारण, तरीही मी माफी मागतो, सगळ्याचा ठपका राष्ट्रवादीवर…

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्वराज्याची स्थापनाही कोकणात आणि जन्म शिवनेरीवर झाला असं म्हटलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

प्रसाद लाड म्हणाले, हे निव्वळ राजकारण, तरीही मी माफी मागतो, सगळ्याचा ठपका राष्ट्रवादीवर...
| Updated on: Dec 04, 2022 | 6:03 PM
Share

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, आमदार संजय गायकवाड आणि आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्याभरातून शिवप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. भाजपच्या विरोधकांनीही राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय आता माघार घेणार नाही असा इशारा दिला आहे.

तर प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले आहे की, मी जे वक्तव्य केले आहे.

त्यानंतर मी म्हटलं आहे की, कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी या सगळ्या आंदोलनाचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेसवर ठेवला आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपली भूमिका मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण वादग्रस्त काही बोललो नाही.

त्यातून नको तो अर्थ काढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकारण केले जात आहे असा ठपका त्यांनी राष्ट्रवादीवर आणि त्यांच्या नेत्यावर ठेवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्याप्रमाणे राजकारण करत आहे त्याचा मी निषेध करतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ज्या भावनेतून आम्ही कार्यक्रम केला आहे, ‘स्वराज्य कोकण भूमी’ त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटले होते की, ती मी चूक सुधारली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्वराज्याची स्थापनाही कोकणात आणि जन्म शिवनेरीवर झाला असं म्हटलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्यासोबत जे संजय यादव बसलेले होते, त्यांनी देखील ऐकले मी काय म्हटले आहे ते त्यांनी ऐकले आहे. तरीही छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ठपका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ठेवला आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....