AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pravin Darekar : काका मला वाचवा हिंदुत्वाची भूमिका घेऊ नका, म्हणून आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार, दरेकरांचा सेनेला टोला

त्यांची सभा झाल्यावर देवेंद्र फडणवीस सुद्धा सभा घेऊन उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला. तर सेनेचा बेस हलतो म्हणून आता सांगावं लागतं. काका मला वाचवा हिंदुत्वाची आमची भूमिका घेऊ नका असे म्हणून आदित्य ठाकरे अयोध्येत जात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Pravin Darekar : काका मला वाचवा हिंदुत्वाची भूमिका घेऊ नका, म्हणून आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार, दरेकरांचा सेनेला टोला
काका मला वाचवा हिंदुत्वाची भूमिका घेऊ नका, म्हणून आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार, दरेकरांचा सेनेला टोलाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 10:26 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर (Ayodhya) आणि हिंदुत्वावरून (Hindutva) जोरदार वार पलटवार सुरू आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आता पुन्हा आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेनेला डिवचलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय तोफा सध्या चागल्याच धडाडत आहे. शिवसेनाला त्यांचं हिंदूत्व सांगावं लागतं, यातच सर्व काही आलं. बाळासाहेबांना सांगावं लागलं नव्हतं हिंदूत्व घेतोय. जनतेने त्यांना हिंदूहृदय सम्राट बनवलं. आता ही वेळ का आली खरं आणि खोटं हिंदूत्व दाखवण्याची, असा सवाल दरेकरांनी सेनेला केला आहे. तर सभा घेऊन उत्तर देणार आहेत चांगलं आहे. पण त्यांची सभा झाल्यावर देवेंद्र फडणवीस सुद्धा सभा घेऊन उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला. तर सेनेचा बेस हलतो म्हणून आता सांगावं लागतं. काका मला वाचवा हिंदुत्वाची आमची भूमिका घेऊ नका असे म्हणून आदित्य ठाकरे अयोध्येत जात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते

तसेच नरेंद्र मोदींनी पाच वर्षे काम केलं पुन्हा लोकांनी निवडून दिले. हिटलर वाटले असते तर लोकांनी निवडून दिले नसते. त्यामुळे क्षमता नसताना राऊत यांनी बोलू नये, असा पलटवार दरेकरांनी केला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील खासदार यांनी राज ठाकरे यांच्याबाबत घेतलेली भूमिका वयक्तिक आहे. त्याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील, असेही ते म्हणाले, तर नवनीत राणा यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले. एक महिला खासदार आहे, त्यांचा छळ केला गेला. हे लोकांना माहित आहे. सरकारला कोर्टाने फटकारलं आहे. भाजप सूडबुद्धीने कारवाया करत नाही. पण हे सरकार यंत्रणेचा वापर करत आहे. तसेच राज्यातील परिस्थिती योग्य नाही. ह्या परिस्थितीमुळे राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आशिष शेलार यांचीही सडकून टीका

तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनीही शिवसेनावर आणि संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांच्या रक्तात हिटलरशाही ते कुणावरही टीका करतात. मोदींवर टीका करण्याची लायकी,ताकद आणी अक्कल त्यांच्यात नाही. पात्रता नसलेल्या छोट्या राऊतांनी मोदींवर बोलू नये, अशी सडकून टीका शेलारांनी केली आहे. तसेच लागलेले पोस्टर्स आणि मजकूर यावरून सेना सभेस लोक येतील यावर त्यांचाच विश्वास उरलेला नाही. 15 मेची भाजप सभा पूर्वनियोजित आहे. ती 14 जूनच्या सेनेच्या सभेला उत्तर देण्यासाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.