राहुल गांधी कुठल्याही तोंडाने राजकीय नेता वाटत नाही. लोकसभा निवडणुक निःपक्षपाती झाली तर भाजप राहणार नाही असं राहुल गांधी बोलले. आमचे 303 आहेत, तुम्हाला विरोधी पक्षनेते पद देखील मिळालं नाही, इतरांवर बोलण्याआधी स्वतःकडे पाहा, असा सल्ला नारायण राणे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला.