AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शेट्टीचा जीव महत्त्वाचा, तसा आमच्या गाईचा नाही का? निलेश राणे यांचा सरकारला घरचा आहेर

Nilesh Rane : गोहत्येवरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सरकारला खडा सवाल विचारला आहे. रोहित शेट्टीचा जीव महत्त्वाचा, तसा आमच्या गाईचा नाही का? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे.

रोहित शेट्टीचा जीव महत्त्वाचा, तसा आमच्या गाईचा नाही का? निलेश राणे यांचा सरकारला घरचा आहेर
Nilesh Rane on CowImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Feb 25, 2026 | 5:05 PM
Share

गोहत्येवरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यात अनेकदा गोमांसाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. तसेच काही भागात गोमांसाची सर्रासपणे विक्री होत असल्याचेही समोर आलेले आहे. यावर आता आमदार निलेश राणे यांनी आवाज उठवत गायींचा जीव महत्त्वाचा नाही का असा प्रश्न सरकारला विचारला आहे. निलेश राणे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

गोहत्येवरून निलेश राणेंचा सरकारला घरचा आहेर

निलेश राणे यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रात गो हत्या थांबली आहे का, हे तपासा. आपण गाईला वाचवू शकत नाहीये. दुसऱ्यांदा या गुन्ह्यात सापडल्यावर मोक्का लावणार म्हणून सांगितले होते. मात्र गोहत्येच्या केसमध्ये सापडलेल्या एकाला तरी मोक्का लावलेले नाव जाहीर करा. रोहित शेट्टीच्या बिल्डिंग वर गोळी मारली तर रस्ता जॅम होईल इतका बंदोबस्त लावला जातो. रोहित शेट्टीचा जीव महत्त्वाचा, तसा आमच्या गाईचा नाही का?’ असा खडा सवाल निलेश राणे यांनी सरकारला विचारला आहे.

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

गोहत्या रोखण्यासाठी अनेक हुंदुत्ववादी संघटना पुढाकार घेत आहेत. अनेकदा कत्तलीसाठी जाणाऱ्या गायींना पकडून त्यांना गोशाळेत पाठवले जात आहे. गोहत्या थांबवण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. मात्र अद्यापही या हत्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळेच निलेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते आणि यापुढे या गुन्ह्यात सापडलेल्या आरोपींवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काजू उत्पादक शेतकऱ्यांवरही भाष्य

पुढे बोलताना निलेश राणे यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही भाष्य केले आहे. राणे म्हणाले की, काजू उत्पादकांना एमएसपी मिळत नाही. हे होणार का? गोव्या राज्याने हे केलं आहे. काजूची लागवड खराब झाली, शेतकरी बरबाद झाला. आपल्या काजूमध्ये आफ्रिकन काजू मिक्स होतो. काजू उत्पादकांना सरकारने संरक्षण द्यावे अशी मागणीही यावेळी राणे यांनी केली आहे.

Follow Us
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेस
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेसवर डबल संकट; बंगालमध्ये खळबळ!
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग...
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश
मोठी खळबळ!दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन
मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; सत्तारांच्या वक्तव्यावर महाजनांचा पलटवार!
Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारा
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू
मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
Mumbai | मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्
Navi Mumbai | शरद पवार गटाच्या आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्....
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज...
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज दाखल करताच...