AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील : आरोग्य मंत्री

राज्यातील लॉकडाऊन वाढवायचा, की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील : आरोग्य मंत्री
| Edited By: | Updated on: Apr 28, 2020 | 1:26 PM
Share

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन वाढवायचा, की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री (Rajesh Tope On Lockdown Extension) आजच निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते.

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविषयी देशातील स्थितीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मोदींनी देशातील स्थिती पाहता लॉकडाऊनवर राज्यांनी आपआपला निर्णय घ्यावा (Rajesh Tope On Lockdown Extension), असं सांगितलं.

“राज्यातील लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील. परंतु, पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार ग्रीन झोन असलेल्या भागांमध्ये आर्थिक व्यवहार सुरु राहतील. आर्थिक परिस्थितीचा विचार करता आर्थिक व्यवहार सुरु करावे लागतील. परंतु, ते हॉटस्पॉटमधले नको. रेड झोनमधले नको. ग्रीन झोनमध्ये सीमा बंद करुन आर्थिक सर्व व्यवहार सुरु ठेवाव्यात, असं पंतप्रधानांनीही नमुद केलं. त्यामुळे या संदर्भातील निर्णय 3 मेनंतर नक्की होईल”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक सुरु आहे. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे ही बैठक पार पडत आहे. यावेळी शरद पवारही उपस्थित आहेत.

थोड्या वेळापूर्वी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीबाबत मंत्रीमंडळाने एकमताने घेतलेल्या निर्णयाचे बैठकीत राज्यपालांना स्मरण करुन देण्यात आलं. मागील बैठकीचे इतिवृत्तांत या बैठकीत अंतिम मंजूर केलं.

राजस्थान-कोटात अडकलेले विद्यार्थी आणि 3 मे ला लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याचा कालावधी संपत असताना पुढील निर्णयांबाबत ठाकरे-पवार बैठकीत चर्चा होत असल्याची शक्यता आहे. तसेच, आज पंतप्रधान यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संदर्भातही चर्चा होत असल्याची शक्यता आहे.

डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आरोग्य सेविकांना 50 लाखांचे विमा संरक्षण देऊ : राजेश टोपे

डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आरोग्य सेविका इत्यादी सर्वांना लाखांचे विमा संरक्षण देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. “ज्या ज्या यंत्रणा कोविड-19 परीस्थितीत काम करत आहेत, मग ते डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आरोग्य सेविका ते अंगणवाडी सेविका असो, त्या सर्वांना 50 लाखांचे विमा संरक्षण दिले जाईल”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करताना घाबरत आहेत. त्यांना सरकार पीपीई किट उपलब्ध करुन देतील. जर त्यांना कोरोना झाला आणि दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यांना 50 लाख विमा कव्हर देऊ. खासगी डॉक्टरांना संरक्षण देऊ, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं (Rajesh Tope On Lockdown Extension).

तसेच, केंद्राने मान्यता दिली तर ठीक आहे. पण, जर केंद्राने मान्यता दिली नाही तर राज्यसरकार या लोकांना विमा संरक्षण देईल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु होणार नाही : आरोग्य मंत्री 

याशिवाय, आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक वाहतुकीवरही भाष्य केलं. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु होणार नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच, रेल्वे, विमानतळ सुरु होणार नाही, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोटामधील विद्यार्थांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील

कोटामध्ये अडकलेल्या 2,000 विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी बसेस पाठवाव्या आणि त्यांना घरी परत आणावे, अशी विनंती मला अनेकांनी केली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावर निर्णय घेतील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं (Rajesh Tope On Lockdown Extension ).

संबंधित बातम्या :

Yavatmal Corona Update : काल 27, आज 19, यवतमाळमध्ये तीन दिवसात 55 रुग्ण, बाधितांची संख्या 79 वर

3 मेनंतर लॉकडाऊन काढणार का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…

पुणे विभागातील 230 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 1457 वर : विभागीय आयुक्त

वर्ध्यात 7 दिवसात 250 जणांनी लक्ष्मणरेषा ओलांडली, जिल्ह्यात प्रवेशासाठी कुठे अॅम्ब्युलन्स, तर कुठे ट्रकचा वापर

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.