AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात येताय तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन या; संजय राऊत यांचं पंतप्रधान मोदी यांना आवाहन

आम्ही आज जम्मूला जाऊ. आमच्या काश्मीरसोबत भावना आहेत. हजारो काश्मिरी पंडित आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मी जाणार आहे. शिख विस्थापितांचा प्रश्न आहे.

महाराष्ट्रात येताय तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन या; संजय राऊत यांचं पंतप्रधान मोदी यांना आवाहन
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 19, 2023 | 9:12 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे. पंतप्रधान मोदी दुपारी मुंबईत येऊन विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. यावेळी ते एका जनसभेलाही संबोधित करणार आहेत. मुंबईत येण्यापूर्वी ते कर्नाटकाच्या दौऱ्यावर असणार आहेत. कर्नाटकातून ते मुंबईत येतील. त्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला डिवचले आहेत. कर्नाटकातून येत आहात तर तिथल्या मुख्यमंत्र्यांना सूचनाच देऊन या. मराठी बांधवांवर अत्याचार करू नका, असं सांगून या, असं आवाहन संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

बेळगावसह सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे कर्नाटकातून येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या संदर्भात तिथल्या मुख्यमंत्र्यांना सूचना द्याव्यात. तसेच महाराष्ट्रात आल्यावर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्याची घोषणा करावी. या पुढे बेळगावातील मराठी बांधवांवर अत्याचार करू नका, अशा सूचना मी पंतप्रधान म्हणून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत, असं सांगावं. आम्हाला आनंद होईल, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.

तर राजकीय भाष्य करू

पंतप्रधानांचं स्वागत नेहमी केलं पाहिजे. ते मुंबईत येत आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यांना कुणाचा विरोध नाही. राजकीय गोष्ट असेल तर बोलू. शिवसेनेने जी कामं केली आहेत, त्याचं उद्घाटन करण्यासाठी भाजपने मोदींना बोलावलं. शिवसेनेने कोणती कामे केली आहेत आणि मोदी त्यातील कोणत्या कामांचं भूमिपूजन करणार आहे हे मी मोजून सांगेल. नाही तर आमचे माजी महापौर सुनील प्रभू यांना विचारा तेही सांगतील, असं राऊत म्हणाले.

हे शिवसेनेचं यश

अनेक प्रकल्पाची योजना, पायाभरणी आणि सुरुवात आम्ही केली होती. त्यातील काही प्रकल्प आता पूर्ण झाले आहेत. त्यापैकी प्रमुख योजनांचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान येत आहेत. हे शिवसेनेचं यश आहे. हे भाजपच्या प्रचाराचं भूमिपूजन आहे, असंही ते म्हणाले.

पक्षीय मतभेद तरी सहभागी होणार

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं. भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात मी जातोय. राहुल गांधी यांचं अखंड भारताचं स्वप्न आहे. भारत काश्मीरपासून कन्याकुमारीपासून एक आहे.

त्यामुळे या अखंड हिंदुस्थानवर शिवसेनेची पावलं उमटली पाहिजे. त्यामुळे सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत आम्ही त्या यात्रेत सहभागी होणार आहोत, असं ते म्हणाले.

आम्ही आज जम्मूला जाऊ. आमच्या काश्मीरसोबत भावना आहेत. हजारो काश्मिरी पंडित आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मी जाणार आहे. शिख विस्थापितांचा प्रश्न आहे. ते शिष्टमंडळ मला भेटणार आहे. त्यांच्या वेदना जाणून घेणार आहे.

राहुल गांधी यांनी ऐतिहासिक कार्यक्रम हाती घेतला आहे. सर्व देश एकत्र जोडला जाईल. या देशातील द्वेष आणि सूड दूर होईल असं राहुल गांधी म्हणाले. आमचे पक्षीय मतभेद असले तरी या यात्रेत सहभागी होणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....