AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हे सरकार किती असंवेदनशील आहे हे या उदाहरणावरून दिसतं”; काँग्रेसनं सरकारला असंवेदनशील का ठरवलं…

अभ्यासक्रमाबाबत असलेल्या त्यांच्या मागण्यांकडे सरकारने याआधीच लक्ष दिले असते तर विद्यार्थ्यांना हे आंदोलन करावे लागले नसते असा टोलाही त्यानी सरकारला लगावला आहे.

हे सरकार किती असंवेदनशील आहे हे या उदाहरणावरून दिसतं; काँग्रेसनं सरकारला असंवेदनशील का ठरवलं...
| Updated on: Feb 23, 2023 | 11:29 PM
Share

मुंबईः पुण्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आयोगाने बदल सुचवला आहे. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे मात्र त्याच वेळी त्यांनी राज्य सरकारलाही असंवेदनशील ठरवले आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी जर आंदोल करावे लागत असेल. सरकार त्यांच्याकडे चार चा दिवस लक्ष देत नसेल तर हे सरकार किती असंवेदनशीर आहे हेच यामधून दिसून येते. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा असा सल्ला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

अभ्यासक्रमाबाबत असलेल्या त्यांच्या मागण्यांकडे सरकारने याआधीच लक्ष दिले असते तर विद्यार्थ्यांना हे आंदोलन करावे लागले नसते असा टोलाही त्यानी सरकारला लगावला आहे.

अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी जर संघर्ष आणि लढा उभा करावा लागत असेल तर हे सरकार विद्यार्थ्यांबाबत किती असंवेदनशील आहे हेच यातून ठळकपणे दिसून येते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या या उभा केलेल्या संघर्षाला आणि लढ्याला शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदनही केले आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारने याआधीच विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायले पाहिजे होते अशी टीका त्यांनी सरकार आणि आयोगावर केली आहे. सरकारनेही विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्या तात्काळ सोडवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.