AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एवढे मंत्री, आमदार रातोरात निघून गेले, कळलं कसं नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांचा गृहमंत्री वळसे पाटलांना सवाल

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र आज शरद पवार उद्धव ठाकरे यांना भेटण्याचीही शक्यता आहे. दुपारनंतर ही भेट होणार आहे.

Eknath Shinde : एवढे मंत्री, आमदार रातोरात निघून गेले, कळलं कसं नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांचा गृहमंत्री वळसे पाटलांना सवाल
सरकार बहुमतात आहे की नाही हे विधानसभेत ठरेलImage Credit source: tv9
| Updated on: Jun 22, 2022 | 12:02 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे एवढे मंत्री आणि आमदारा रातोरात निघून गेले. बंड केले. कळले कसे नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांच्यासोबत अखेरचे अपडेट येईपर्यंत 45 आमदार असल्याचे बोलले जात आहे. या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात असून याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक होत आहे. सिल्व्हर ओक या पवारांच्या बंगल्यावर ही बैठक होत आहे. यावेळी शरद पवार यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब पाटील आदी नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र आज शरद पवार उद्धव ठाकरे यांना भेटण्याचीही शक्यता आहे. दुपारनंतर ही भेट होणार आहे. महाविकास आघाडीवर संकट असून अशा परिस्थितीत शरद पवार सक्रिय झाले असून बैठका ते घेत आहेत. संख्याबळ आणि तांत्रिक बाबींवर या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. शिंदेंकडे 40हून अधिक आमदार असतील आणि ते भाजपाला पाठिंबा देणार असतील, तर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार आहे. त्यामुळे या पेचप्रसंगात काय निर्णय घ्यायचा, याविषयी पवार ठाकरेंशी चर्चा करणार आहेत.

‘शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न’

शरद पवार यांनी काल या राजकीय घडामोडींवर हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणाले होते. नेमके काय झाले, हे माहीत नाही. शिवसेनेकडून कळवले जात नाही, तोवर काहीही बोलणार नाही. याविषयी अभ्यास करू, बैठका घेऊ. मात्र तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील, याविषयी तिन्ही पक्षांत एकमत आहे. जर मुख्यमंत्री बदलायचा असेल, तर तो निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे, असे काल शरद पवार म्हणाले होते.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....