AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एवढे मंत्री, आमदार रातोरात निघून गेले, कळलं कसं नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांचा गृहमंत्री वळसे पाटलांना सवाल

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र आज शरद पवार उद्धव ठाकरे यांना भेटण्याचीही शक्यता आहे. दुपारनंतर ही भेट होणार आहे.

Eknath Shinde : एवढे मंत्री, आमदार रातोरात निघून गेले, कळलं कसं नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांचा गृहमंत्री वळसे पाटलांना सवाल
सरकार बहुमतात आहे की नाही हे विधानसभेत ठरेलImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 22, 2022 | 12:02 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे एवढे मंत्री आणि आमदारा रातोरात निघून गेले. बंड केले. कळले कसे नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांच्यासोबत अखेरचे अपडेट येईपर्यंत 45 आमदार असल्याचे बोलले जात आहे. या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात असून याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक होत आहे. सिल्व्हर ओक या पवारांच्या बंगल्यावर ही बैठक होत आहे. यावेळी शरद पवार यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब पाटील आदी नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र आज शरद पवार उद्धव ठाकरे यांना भेटण्याचीही शक्यता आहे. दुपारनंतर ही भेट होणार आहे. महाविकास आघाडीवर संकट असून अशा परिस्थितीत शरद पवार सक्रिय झाले असून बैठका ते घेत आहेत. संख्याबळ आणि तांत्रिक बाबींवर या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. शिंदेंकडे 40हून अधिक आमदार असतील आणि ते भाजपाला पाठिंबा देणार असतील, तर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार आहे. त्यामुळे या पेचप्रसंगात काय निर्णय घ्यायचा, याविषयी पवार ठाकरेंशी चर्चा करणार आहेत.

‘शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न’

शरद पवार यांनी काल या राजकीय घडामोडींवर हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणाले होते. नेमके काय झाले, हे माहीत नाही. शिवसेनेकडून कळवले जात नाही, तोवर काहीही बोलणार नाही. याविषयी अभ्यास करू, बैठका घेऊ. मात्र तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील, याविषयी तिन्ही पक्षांत एकमत आहे. जर मुख्यमंत्री बदलायचा असेल, तर तो निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे, असे काल शरद पवार म्हणाले होते.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?