AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील निकालावर शत्रृघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया; म्हणाले, हा निर्णय म्हणजे…

देशातील सर्वात मोठी न्यायव्यवस्था आहे. सरन्यायाधीशांनी या निर्णयाचे वाचन केले. या निर्णयाचे स्वागत आपण केले पाहिजे.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील निकालावर शत्रृघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया; म्हणाले, हा निर्णय म्हणजे...
| Updated on: May 11, 2023 | 9:01 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायायलाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांकडे बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेते शत्रृघ्न सिन्हा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता काही बोलण्याचा,टीका-टीपण्णी करण्याचा प्रश्न येत नाही. कारण सर्वोच्च न्यायालय ही सर्वोच्च अथॉरिटी आहे. देशातील सर्वात मोठी न्यायव्यवस्था आहे. सरन्यायाधीशांनी या निर्णयाचे वाचन केले. या निर्णयाचे स्वागत आपण केले पाहिजे. जर-तर करण्याचा कुणाला अधिकार नाही. जो निर्णय झाला तो सर्वांनी मान्य करायला पाहिजे. मला वाटतं की, हा निर्णय राज्यातील जनतेच्या हिताचा आहे.

शरद पवार मोठे चाणक्य

नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. देशात महागटबंधन तयार करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. देशात भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम सध्या सुरू आहे. यावर बोलतान शत्रृघ्न सिन्हा म्हणाले, नितीश कुमार हे योग्य व्यक्ती आहेत. शरद पवार राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठे चाणक्य आहेत. शरद पवार हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. ते देशाची आण, बाण आणि शान आहेत.

नितीश कुमार, तेजस्वी यादव यांचीही स्तुती

शरद पवार यांना देशात मानले जाते. तेजस्वी यादव हुशार आहेत. शरद पवार यांनी नितीश कुमार यांचे स्वागत केले. ही घटना समाज, राजकीय पक्ष, महाराष्ट्र, बिहार यासाठी मोठी उपलब्धी आहे.

नवीन चांगले नेतृत्व येईल

यापूर्वी चेहऱ्यांवर चर्चा होत नव्हती. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर कोण, लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतर कोण, इंदिरा गांधी यांच्यानंतर कोण, असं होत होतं. पण, नवीन चांगलं नेतृत्व आलं आणि देशाचा कारभार व्यवस्थित सुरू आहे.

कर्नाटकता एक्सिट पोलनंतर भाजपची परिस्थिती काय आहे, हे लक्षात आलं. निकालानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. चेहरा नव्हे, तर मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत. देशात महागाई, बेरोजगारी आहे. डॉलर वर जात आहे. रुपया खाली येत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.