“कशासाठी वकिलांची फौज उभा करताय”; धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाला डिवचले

| Updated on: Jan 21, 2023 | 6:52 PM

जर न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास नसेल, न्यायालयाच्या निर्णयावर विलंब होत असल्याचा ठपका ठेवत असतील तर ठाकरे गटाकडून वकिलांची फौज न्यायालयात का उभा केली जात आहे असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला आहे.

कशासाठी वकिलांची फौज उभा करताय; धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाला डिवचले
Follow us on

मुंबईः शिवसेना संपवण्याची सुपारी खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वावादाची ही शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवसापासून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे, तेव्हापासून संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाला धनुष्यबाणाबाबत न्यायालय निकाल का देणार आहे हे माहिती असल्यामुळेच त्यांनी शिंदे गटावर टीका करत आहेत.

कोणताही पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्षाची मान्यता असो ही लोकप्रतिनिधींच्या बहुमतावरच अवलंबून असते. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि त्या पक्षाच्या धनुष्यबाणावर शिंदे गटाचा हक्क आहे. लोकशाहीमध्ये बहुमताल मान्यता आहे.

त्यामुळे आमच्या शिंदे गटाकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निकाला ठाकरे गटाला माहिती असल्यामुळेच त्यांच्याकडून निकालाबाबत दुटप्पीपणाची भूमिका मांडली जात असल्याची टीका नरेश म्हस्के यांच्याकडून केली गेली आहे.

सध्या खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या गळ्यात गळे घालून ही यात्रा केली आहे.

मात्र यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्य्याला काय वाटले असेल असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना धनुष्यबाणावरून त्यांनी टीका केली आहे.

ते म्हणाले आहे की, त्यांना जर न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास नसेल, न्यायालयाच्या निर्णयावर विलंब होत असल्याचा ठपका ठेवत असतील तर ठाकरे गटाकडून वकिलांची फौज न्यायालयात का उभा केली जात आहे असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला आहे.

ठाकरे गटाकडून धनुष्यबाणाविषयी कायम दुटप्पीपणाची भूमिका मांडली जात आहे. त्यातच शिंदे गटाकडे बहुमत असल्यामुळे न्यायालयाचा निर्णय काय लागणार आहे हे ठाकरे गटाला समजल्यामुळेच त्यांच्याकडून भावनिक राजकारण केले जात आहे असा टोलाही नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.