मुंबईः सध्या राज्यात सर्वत्र पदवीधर मतदार संघावरून जोरदार राजकारण तापले आहे. प्रचाराला वेग आला असून महाविकास आघाडीचे सरकार असताना शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून मविआवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मविआच्या काळात शिक्षकांच्या अनेक प्रश्न मांडले गेले.