AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“‘मविआ’ने काय केले नाही म्हणून देवेंद्रजी आणि एकनाथजीच शिक्षकांचे प्रश्न सोडवणार”; भाजप नेत्याकडून पदवीधर निवडणुकीवरून विरोधकांना डिवचले

राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे, आणि शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जातील असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

'मविआ'ने काय केले नाही म्हणून देवेंद्रजी आणि एकनाथजीच शिक्षकांचे प्रश्न सोडवणार; भाजप नेत्याकडून पदवीधर निवडणुकीवरून विरोधकांना डिवचले
| Updated on: Jan 21, 2023 | 5:55 PM
Share

मुंबईः सध्या राज्यात सर्वत्र पदवीधर मतदार संघावरून जोरदार राजकारण तापले आहे. प्रचाराला वेग आला असून महाविकास आघाडीचे सरकार असताना शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून मविआवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मविआच्या काळात शिक्षकांच्या अनेक प्रश्न मांडले गेले.

मात्र त्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. ते मंत्रालयामध्ये किती काळ उपस्थित होते आणि त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केले आले असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिक्षकांनी ऐन दिवाळीत आझाद मैदानावर आंदोलन केले. मात्र तरीही प्रश्न सुटले नाहीत. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा होऊन पहिल्या टप्प्यातील प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारने सोडवले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

त्यामुळे राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे, आणि शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जातील असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्न दोन्ही सरकारच्यावतीने सोडवले जातील असा विश्वास बावनकुळे यांनी दिला आहे.

त्याच बरोबर दोन्हीकडे हे सरकार असल्याने मराठवाड्यातील मतदारांनी विचार करून भाजपच्या पाठिंब्यावर उभा असलेल्या उमेदवाराला मतदान करावे असे आव्हानही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

राज्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून जैसे थे आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना अठरा अठरा वर्षे न सुटलेले प्रश्न घेऊन शिक्षकांनी आंदोलन केले तरीही या महाविकास आघाडीने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.

त्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मात्र लक्ष घालून त्यांनी पहिल्या टप्प्यातील प्रश्न सोडवण्याचा मार्ग खुला केला असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.