AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोसायट्यांना रजिस्ट्रेशन नूतनीकरणासोबतच सादर करावा लागणार फायर ऑडिट रिपोर्ट; आगीच्या घटना टाळण्यासाठी महापालिकेचे आदेश

दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या आगीच्या घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आता सोसायट्यांना रजिस्ट्रेशन नूतनीकरणासोबतच फायर ऑडिट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोसायट्यांना रजिस्ट्रेशन नूतनीकरणासोबतच सादर करावा लागणार फायर ऑडिट रिपोर्ट; आगीच्या घटना टाळण्यासाठी महापालिकेचे आदेश
Image Credit source: TV9
| Updated on: May 13, 2022 | 8:37 AM
Share

मुंबई : दिवसेंदिवस आगीच्या (Fire) घटनांमध्ये वाढ होत आहे. उंच इमारतीला (building) आग लागल्यास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करावी लागते, मात्र तरी देखील आग नियंत्रणात येत नाही. आगीवर वेळेत नियंत्रण न मिळवण्यात आल्याने इमरतीला लागलेल्या आगीत अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, तर कारी जण गंभीर जखमी होतात. अशा घटना होऊ नयेत, यासाठी आता मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) पुढाकार घेण्यात आला आहे. यापुढे दरवर्षी सोसायटीच्या रजिस्ट्रेशनचे नुतनीकरण करताना आता फायर ऑडिट रिपोर्ट देखील सादर करणे बंधनकारक असणार आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईत उंच इमरतींना आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र यातील काही घटनांमध्ये संबंधित सोसयटीची अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या वतीने सोसायटीच्या रजिस्ट्रेशनचे नुतनीकरण करताना फायर ऑडिट रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात अग्निशमन दालाला देखील महापालिकेच्या वतीने पत्र देण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.

पाच हजारांहून अधिक बहूमजली इमारती

मुंबईत 12 किंवा त्याहून अधिक मजले असलेल्या सुमारे पाच हजारांहून अधिक सोसायट्या आहेत. आकडेवारीवर नजर टाकल्यास आपल्याला असे दिसून येते की, मुंबईत गेल्या दहा वर्षांमध्ये उंच इमारतीला आग लागण्याच्या जवळपास दीड हजारांहून अधिक घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की, चाळीस टक्के आगीच्या घटनांमध्ये संबंधित इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नव्हती. ही बाब गंभीर आहे. ज्या सोसायटीमध्ये आग लागली आणि तिथे अग्नीरोधक उपकरणे उपलब्ध असतील तर आगीवर लगेच नियंत्रण मिळवता येते. हेच लक्षात घेऊन आता मुंबई महापालिकेकडून सोसायट्यांना आदेश देण्यात आले आहेत.

आग नियंत्रणात अडचणी

ज्या दोन किंवा तीन मजली इमारती आहेत, त्यांना आग लागल्यास अग्निशमन दल घटनास्थळी धाव घेऊन ही आग लवकर नियंत्रणात आणू शकते. या इमारतींची उंची ही जास्त नसल्यामुळे आग नियंत्रणात आण्यात अडचण येत नाही. मात्र ज्या इमरती या बहुमजली असात त्या इमरतीला लागलेली आग निंयत्रणात आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच बहू मजली इमरतीमध्ये तिथे राहणाऱ्या कुटुंबांची संख्या जास्त असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यात असते, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महापालिकेकडून फायर ऑडीट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Follow Us
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक.
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश.
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत....
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत.....