कितीही हल्ले झाले… काहीही घडलं तरी… सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?
नेत्रा पवार यांनी मुंबईच्या अविचल स्पिरीटचे कौतुक केले, की कितीही संकटे आली तरी मुंबई थांबत नाही. टाटा मॅरेथॉननिमित्त बोलताना त्यांनी मुंबईची लवचिकता, धावपटूंचे स्वप्न आणि फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबई नेहमीच धावते, हीच तिची खरी ओळख असून, जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या मॅरेथॉनसाठी तयारी सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.

मुंबईत कितीही हल्ले झाले, काहीही घटना घडल्या तरी मुंबई थांबत नाही. मुंबई झुकत नाही आणि हारतही नाही. मुंबई नेहमीच चालत राहते. पळत राहते, असं गौरवौद्गार राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढलं आहे. टाटा मॅरेथॉनच्या निमित्ताने मीडियाशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी मुंबईच्या स्पिरीटला सलाम केला. मुंबईची खासियत, मुंबईचं वेगळपण आणि मुंबईची महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. तसेच टाटा मॅरेथॉनमध्ये धावण्याचं स्वप्न घेऊनच प्रत्येकजण येत असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
टाटा समूहाचं मुंबईत मोठं योगदान राहिलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. तसेच सर्वांना मुंबईची खासियतही माहीत आहे. काहीही घडलं तरी मुंबई कधीच थांबत नाही. मुंबई नेहमीच धावत राहते. मुंबई पळत राहते. हीच मुंबईची खासियत आहे. टाटा मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येक रनर हे स्वप्न घेऊनच आलेला असतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने स्पर्धेत भाग घेतो. प्रत्येकाची कारणं वागेळी असतात. दिव्यांगही धावत असतात. प्रत्येकजण आपआपलं स्वप्न घेऊनच पळत असतात. प्रत्येकजण स्वप्न घेऊन धावत असतात, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
फिटनेसचा कानमंत्र
सुनेत्रा पवार यांनी यावेळी फिटनेसचा मंत्रही दिला. फिटनेसची जागृती असली पाहिजे. फिटनेस महत्त्वाची आहे. कोविड नंतर आपल्याला फिटनेसचं पुन्हा एकदा महत्त्व कळालं आहे. अनादी काळापासून योगाचं महत्त्व राहिलंच आहे. त्यामुळे प्रत्येकाने फिट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरोग्य टिकवून ठेवलं पाहिजे, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
मुंबईत टाटा मॅरेथॉन कधी?
मुंबईत पुढच्या वर्षीची टाटा मॅरेथॉन येत्या 17 जानेवारी 2027 रोजी होणरा आहे. फूल, हाफ, ओपन, ड्रीम रन, सीनियर सिटीजन रम आणि चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी अशा कॅटेगिरीमध्ये ही मॅरेथॉन होत असते. या मॅरेथॉनसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये देशभरातील रनर भाग घेत असतात. शिवाय विदेशातूनही रनर या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे ही स्पर्धा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते.