AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य आग ओकतोय! राज्यातील 17 जिल्हाचं तापमान 40 अंशापेक्षा जास्त! तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

कोरोना संकटात तापमान वाढीचाही सामना राज्यातील जनतेला करावा लागत आहे. अशावेळी नागरिकांनी कोरोनासह उन्हापासूनही बचाव करणं गरजेचं बनलंय.

सूर्य आग ओकतोय! राज्यातील 17 जिल्हाचं तापमान 40 अंशापेक्षा जास्त! तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 06, 2021 | 8:52 PM
Share

मुंबई : कोरोनाची स्थिती विदारक बनलेली असतानाच राज्यात सूर्य आग ओकत असल्याचं चित्र निर्माण झालंय. कारण आज राज्यात एकूण 17 जिल्ह्यातील पारा 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवला गेलाय. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, नाशिक आणि मुंबईतही तीव्र उन्हाळा भासत आहे. त्यामुळे कोरोना संकटात तापमान वाढीचाही सामना राज्यातील जनतेला करावा लागत आहे. अशावेळी नागरिकांनी कोरोनासह उन्हापासूनही बचाव करणं गरजेचं बनलंय. (Temperatures above 40 degrees Celsius in many districts of Vidarbha and Marathwada)

कोणत्या शहरात किती तापमान ? (अंश सेल्सियसमध्ये)

अकोला – 42.9 अमरावती – 41.0 बुलडाणा – 40.0 ब्रम्हपुरी – 42.4 चंद्रपूर – 43.2 गडचिरोली – 40.6 गोंदिया – 40.5 नागपूर – 42.0 वर्धा – 42.4 वाशिम – 41.0 यवतमाळ – 41.7 मालेगाव – 41.8 सातारा – 39.0 परभणी – 40.8 बारामती – 38.8 नांदेड – 41.5 सोलापूर – 40.9 कोल्हापूर – 37.8 औरंगाबाद – 39.7 सांगली – 38.3 बीड – 40.7 जेऊर – 40.0 पुणे – 39.1 नाशिक – 39.2 जालना – 39.8 जळगाव – 41.4 मुंबई – 35.8

गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध शहरातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता उष्माघातापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक झालं आहे. त्यामुळे उष्माघात होऊ नये यासाठी काय करावं, उष्माघाताची लक्षणं काय आणि उष्माघातावर काय उपचार करावा हे माहीत असणे गरजेचं आहे.

उष्माघाताची लक्षणं कशी ओळखाल?

  • चक्कर येणे
  • डोकं दुखणे
  • सुस्ती आल्यासारखं वाटणे आणि डोकं हलकं झाल्यासारखं वाटणे
  • गरम होत असूनही घाम न येणे
  • त्वचा लालसर होणे
  • त्वचा कोरडी पडणे
  • अशक्तपणा जाणवणे
  • मळमळ होणे, उलट्या होणे
  • जोरात श्वास घेणे
  • हृदयाचे ठोके वाढणे

जर कधी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणामध्ये ही वरील लक्षणं दिसून आली. तर त्याला उष्माघाताचा त्रास होतो आहे हे समजावं आणि त्याला तातडीने उपचार उपलब्ध करुन द्यावी.

उष्माघातापासून बचाव होण्यासाठी काय करावे?

  • भरपूर प्रमाणात पाणी प्या, दररोज 8 ग्लास पाणी प्यायला हवं, ते शरीरासाठी आवश्यक आहे
  • अंघोळ करताना थंड पाण्याचा वापर करा, त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहील
  • हलका पण पौष्टिक आहार घ्या, आहारात काकडी, कलिंगड, ताक यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करा
  • सुती कपड्यांचा वापर करा
  • बराच वेळ उन्हात राहावं लागत असेल तर त्वचेवर पाणी शिंपडत राहा, तसेच थोड्या थोड्या वेळानी पाणी प्या
  • दुपारचं बाहेर पडणं टाळा, विशेषकरुन सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत बाहेर उन्हात पडू नका
  • उन्हात असाल तर टोपी, छत्री, स्कार्फ यांचा वापर करा
  • अतिरिक्त मद्यमान, साखर असलेले पेय किंवा कॅफेन असलेले पेय टाळा, यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते
  • अतिप्रमाणात व्यायाम करणं टाळा

संबंधित बातम्या :

सूर्य आग ओकतोय! चंद्रपुरात तब्बल 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तुमच्या शहरात काय स्थिती?

Summer Foods : उन्हाळ्यात डायटमध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा, मिळवा भरपूर फायदे

Temperatures above 40 degrees Celsius in many districts of Vidarbha and Marathwada

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली