AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray | दिवाळी संपल्यावर बोनस देणार? आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांनी टि्वट केलय. त्यांनी महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या प्रश्नावरुन शिंदे सरकारला धारेवर धरलय. पुढील 24 तासांत यापैकी काय होते ते पाहू असे सूचक शब्द त्यांनी टि्वटमध्ये वापरले आहेत.

Aaditya Thackeray | दिवाळी संपल्यावर बोनस देणार? आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल
aaditya thackeray and eknath shinde
| Updated on: Nov 08, 2023 | 2:10 PM
Share

मुंबई : दिवाळी तोंडावर आलीय. पण अजूनही BMC आणि BEST च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळालेला नाही, त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. “अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच BMC आणि BEST च्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही CMO च्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार (लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत) दिवाळी बोनस देणार आहे की नाही?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. ‘देणार असेल, तर कधी? दिवाळी संपल्यावर?’ असा खोचक टोमणा लगावला आहे. आदित्य ठाकरे शिंदे सरकारला सतत लक्ष्य करत असतात.

“रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्याची फाइल अंतिम स्वाक्षरीसाठी महापालिका आयुक्तांच्या डेस्कवर पोहोचली आहे. ते त्यावर स्वाक्षरी करून त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करणार की खोके सरकारच्या दबावापुढे झुकून त्यांच्याबरोबरीने मुंबई लुटणार? पुढील 24 तासांत यापैकी काय होते ते पाहू…” असं आदित्य ठाकरे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. आदित्य ठाकरे मुंबईच्या प्रश्नावरुन सतत आवाज उठवत असतात. मुंबईतील रस्त्यांचा विषय त्यांनी लावून धरलाय.

ग्राम पंचायत निकालात ठाकरे गट सर्वात शेवटी

दरम्यान राज्यात नुकताच ग्राम पंचायच निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात महायुतीने महाविकास आघाडीवर मात केली. महायुतीमध्ये भाजपा अव्वल पक्ष ठरला. त्यानंतर अजित पवार गट आणि शिंदे गटाने ग्राम पंचायती जिंकल्या. जळगाव ग्रामीण आणि महाडमध्ये शिंदे गटाने लक्षणीय यश मिळवलं. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा दुप्पट ग्राम पंचायची जिंकल्या. राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत ठाकरे गट शेवटच्या स्थानावर राहिला.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.